भाडोत्री शिक्षक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: January 8, 2015 01:14 IST2015-01-08T01:14:12+5:302015-01-08T01:14:12+5:30
भाडोत्री शिक्षक कार्यरत असल्याची बाब ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड; प्रशासनात एकच खळबळ.
_ns.jpg)
भाडोत्री शिक्षक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
बुलडाणा : देऊळघाट येथील परिषदेच्या शाळेवर भाडोत्री शिक्षक कार्यरत असल्याची बाब ह्यलोकमतह्ण ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यकार्यपालन अधिकारी देशमुख यांनी ह्यलोकमतह्णचे वृत्त वाचताच सकाळीच शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना याबाबत सूचना दिल्या. आज बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवसभर बैठकांचे सत्र असल्यामुळे शिक्षणाधिकारी ठग यांनी बुलडाणा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयङ्म्री बोर्डे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बोर्डे व केंद्रप्रमुख संजय पवार यांनी शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. यासंदर्भात जयङ्म्री बोर्डे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, शाळेवर जाऊन मुख्याध्यापकांकडून या प्रकरणात लेखी घेतले आहे; तसेच विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा अहवाल शिक्षणाधिकारी यांना देणार असून, यासंदर्भात आताच बोलणे उचीत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
अपंग समावेशीत शिक्षण योजना बंद झाली असून, या योजनेच्या नावाखाली भाडोत्री शिक्षक नेमण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीअंती दोषीवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगीतले.
* मुख्याध्यापकांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांची चौकशी
देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी.डी.वायाळ यांच्या निर्देशावरूनच भाडोत्री शिक्षकाची शिक्षण सेवा सुरू होती, तसेच वायाळ यांच्याकडे असलेले विषय सदर शिक्षक शिकवित होता. लोकमतच्या चमूने १0 अ या वर्गात सदर भाडोत्री शिक्षक शिकवीत असल्याचे कॅमेराबद्ध केले होते; मात्र आज शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठविलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी जयङ्म्री बोर्डे यांनी प्रभारी मुख्याध्यापक वायाळ यांच्या समक्षच विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्याची माहिती आहे. आम्हाला वायाळ सरच शिकवित होते, असे अर्ज आज विद्यार्थ्यांकडून भरून घेतल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ज्यांच्या विरोधात चौकशी आहे त्यांच्याच उपस्थितीत चौकशी होत असेल तर या प्रकरणात दोषींना वाचविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन काम करीत असल्याची शंका व्यक्त होत आहे.