शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 17:36 IST

बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देयावर्षी गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये कळविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३० जूनची मुदत परीक्षा परिषदेकडून ठेवण्यात आली आहे.

 - ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र यावर्षी गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये कळविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३० जूनची मुदत परीक्षा परिषदेकडून ठेवण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. १८ फेब्रुवारी रोजी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी तीन वाजता आॅनलाईन जाहीर झाला. यामध्ये पाचवीचा निकाल २३.०९ टक्के; तर आठवीचा १२.६४ टक्के लागला आहे. दोन्ही इयत्तांचा मिळून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केवळ १८.५८ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून दिल्यानंतर या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह परिषदेकडे अर्ज करता येतो. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्ज करता येतो. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २१ ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुदतीमध्ये आॅनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे. मुदतीत आॅनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे

 नावासह इतर दुरूस्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अर्ज आॅनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

प्रत्येक पेपरला ५० रुपये शुल्क

गुणांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये शुल्क ठेवण्यात आलेला आहे. यावर्षी गुणांच्या पडताळीची प्रक्रिया आॅनालाईन राबविण्यात येत असताना पेपरची ५० रुपये शुल्काची रक्कमही आॅनलाईन पेमेंटद्वारेच भरणे आवश्यक असल्याच्या सुचना राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिल्या आहेत.

निकाल घसरला

राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ४ लाख ७५ हजार ८८५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ९ हजार २२५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ५८ हजार ९०२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ४५ हजार ३९७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही वर्गाचे विद्यार्थी मिळून राज्यात ८ लाख ३१ हजार ७८६ विद्यार्थ्यांपैकी केवळ १ लाख ५४ हजार ६८१ विद्यार्थीच पात्र ठरले आहेत. त्यामुळे उर्वरित ८२ टक्के विद्यार्थी हे अपात्र ठरल्याने निकालाची टक्केवारी घसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षणonlineऑनलाइन