जंगलातील पक्ष्यांच्या खाद्यासाठी दीड क्विंटल तांदूळ

By Admin | Updated: April 26, 2017 00:47 IST2017-04-26T00:47:29+5:302017-04-26T00:47:29+5:30

‘वन्यजीव सोरयें’चा उपक्रम : जंगलात पक्ष्यांना दिले जाते अन्न

One-and-a-half kilograms of rice for the wild birds | जंगलातील पक्ष्यांच्या खाद्यासाठी दीड क्विंटल तांदूळ

जंगलातील पक्ष्यांच्या खाद्यासाठी दीड क्विंटल तांदूळ

बुलडाणा : येथील वन्यजीव सोयरे या सामाजिक संस्थेने जंगलातील पक्ष्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते व संस्थेने प्रतिसाद दिला असून, रेणुका मंदिर संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थान चिखली यांचे उपाध्यक्ष गोपाल शेटे यांनी दीड क्विंटल तांदूळ देऊन पुढाकार घेतला आहे.
बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे संस्थेने १२ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन १५ ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पशू पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत, यासाठी पाणी मातीचे पॉट लावले. याद्वारे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; पण वनात पक्ष्यांना खायला पाहिजे तेवढे नसल्यामुळे वण वण भटकंतीचा विचार करून वन्यजीव सोयरे, बुलडाणा यांनी पक्ष्यांना खाद्याची सोय करायचा विचार करून दर रविवारी वन्यजीव सोयरेंनी लावलेल्या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पॉट खाली रविवारी सकाळी जेवढे शक्य होईल तेवढे तांदूळ टाकण्यास सुरुवात केली आहे.
याद्वारे पक्ष्यांच्या खाद्याची ही सोय होणार असून, पक्ष्यांची भटकंती थांबण्यास मदत होईल, याबाबत खाद्यान्नासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तत्काळ वन्यजीव सोयरे सागर आवटे यांना दूरध्वनी करून रेणुका मंदिर संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थान चिखली यांचे उपाध्यक्ष गोपाल शेटे यांनी दीड क्विंटल तांदूळ वन्यजीवांच्या खाद्यासाठी दिला. सदर तांदूळ संस्थानचे अध्यक्ष राजू खरात, उपाध्यक्ष गोपाल शेटे आणि सचिव वसंत शेटे यांच्या हस्ते वन्यजीव सोयरे जयंतकाका हिंगे, सागर आवटे, नितिन व्यवहारे, सूरज वाडेकर आणि नितिन श्रीवास्तव यांच्याकड़े वन्यजीवांच्या खाद्यासाठी दिले.

खाद्यान्न देण्यासाठी पुढाकार घ्यावा!
ज्ञानगंगा अभयारण्यातून जात असतांना पाण्याच्या पॉटमध्ये पाणी आणि आपल्या जवळ असलेले काही थोड्या प्रमाणात खाद्य पॉट खाली पक्षांना टाकावे जे लोक ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्षांना खाद्य असून टाकू शकत नाहीत, त्यांनी वन्यजीव सोयरे सागर आवटे, नितिन व्यवहारे, नितिन श्रीवास, सूरज वाडेकर, जयंत हिंगे आणि गणेश श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधावा व खाद्यान्न द्यावे, असे आवाहन केले होते.

Web Title: One-and-a-half kilograms of rice for the wild birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.