शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

जुन्या हंगामातील तूर, हरभऱ्याचे अनुदान आले नव्या हंगामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:32 IST

आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील वर्षीच्या हंगामातील तूर व हरभºयाचे अनुदान एक वर्षानंतर नव्या हंगामात प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७०० शेतकऱ्यांना आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आजही तूरीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी शासनाकडून हमीभाव ठरवून दिलेला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला.परंतू काही शेतकºयांचा तूर व हरभरा रात्रं-दिवस नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी रांगा लाऊनही खरेदी होऊ शकला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभरा नाफेडकडे विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली; परंतू ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झाला नाही, त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. दरम्यान, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही शेतकºयांना तूर व हरभऱ्याचे हे अनुदान मिळाले नव्हते. खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी तूर व हरभºयाचे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.परंतू ती पूर्ण होऊ शकली नाही. आता दुसºया वर्षीचा रब्बी हंगाम सुरू झाला असताना मागील वर्षीच्या तूर व हरभºयाचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत तुरीचे २० कोटी ९० लाख ९७ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. तर उर्वरीत २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, शेतकºयांना त्वरेने हे अनुदान मिळावे अशी ओरड होत आहे. ९२ टक्के शेतकऱ्यांना मिळाले हरभरा अनुदानमहाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हरभरा अनुदानासाठी १ हजार १७३ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १ हजार ९० शेतकºयांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील २३९, सिंदखेड राजा ७२, मोताळा १७, बुलडाणा १२६, लोणार ३००, शेगाव १२८ व संग्रामपूर तालुक्यातील १५४ शेतकºयांना हरभºयाचे अनुदान देण्यात आले आहे.

अडीच हजार शेतकऱ्यांचे तूरीचे अनुदान रखडले४तूरीच्या अनुदानासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत २१ हजार ६२० शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी १७ हजार ६१० शेतकºयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. तर २ हजार ४११ शेतकºयांचे तूरीचे अनुदानन रखडले आहे.आतापर्यंत आलेले तूर व हरभºयाचे अनुदाना शेतकºयांना वितरीत करण्यात आले आहे. तूरीचे उर्वरीत अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. आल्यानंतर ते तातडीने वाटप होईल.- एम. एच. माने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी