शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबारवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची संख्या गूलदस्त्यात; अधिकाऱ्यांची भूमिका संशयात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 13:01 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात.

अझहर अली

संग्रामपूर (बुलढाणा) : वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच ढगाळ वातावरण निसर्ग अनुभव कार्यक्रमात अडसर ठरल्याचे कारण पूढे करून वन्यप्राण्यांची आकडेवारी गूलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरून अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या वन्य प्राण्यांची माहिती जाहीर करण्यात येणार असल्याने वरीष्ठ अधिकाय्रांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सततच्या पावसाने अभयारण्यात जागोजागी पाणी साचल्याने वन्यप्राण्यांनी पाणवट्यांवर येणे टाळले. असा कयास लावण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्राण्यांच्या नोंदी घेण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शुक्रवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री दरवर्षी प्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याने जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वन्यप्राण्यांनी पाहिजे त्याप्रमाणात दर्शन दिले नसल्याचे बोलल्या जात आहे. अंबाबरवा अभयारण्यात ५ मे शुक्रवार ला दुपारी ५ वाजता पासून ६ मे शनिवारी च्या सकाळी ८ वाजेपर्यंत निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत जंगल सफारी बंद ठेवण्यात आली होती. वन्यजीव विभागाकडून करण्यात आलेल्या प्राणी गणनेत वाघ, बिबट, अस्वल, नील गाय, सांबर, भेडकी, गवा, रान डुक्कर, लंगूर, माकड, रान कोंबडी, रान मांजर, मोर, ससा, सायाळ अशा असंख्य प्राण्यांनी दर्शन दिल्याची माहिती आहे. मात्र वन्यजीव विभागाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध न करता वरिष्ठ स्तरावर पाठविल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार अकोट येथील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून १५ मे पर्यंत वन्यप्राण्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पुष्ठभूमीवर अभयारण्यात ८ नैसर्गिक २७ कुत्रिम असे एकूण ३५ पाणवठ्यावर ३५ मचान उभारण्यात आले. विविध बिट मधील ३५ मचानवरून वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या प्राणी गणनेसाठी १९ वनरक्षक, ५ वनपाल, ४ विशेष व्याघ्रदलाचे जवान ४२ मजूर  कर्तव्यावर होते. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमात प्रवेश नाकारण्यात आल्याने निसर्ग व प्राणी प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी वाघांसोबत ८०१ प्राण्यांची नोंदी

अंबाबरवा अभयारण्यात शुक्रवारी पार पडलेल्या प्राणी गणनेत वन्यजीवांची संख्या गूलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. गतवर्षी सन २०२२ मध्ये अंबाबरवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते. यामध्ये ६ वाघ, ६ बिबट, १५ अस्वल, २ तडस, ७० नील गाय, ४९ सांबर, २८ भेडकी, ४८ गवा, १७२ रान डुक्कर, २ लंगूर, १५५ माकड, ११ म्हसण्या उद, ५४ रान कोंबडी, १ रान मांजर, १५१ मोर, १० ससा, १२ सायाळ, २ कोल्हा, ७ लांडगा असे एकूण ८०१ प्राण्यांची नोंद आहे. यावर्षी मात्र वन्य प्राण्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच ढगाळ वातावरणामुळे अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.- सुनील वाकोडेवन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)सोनाळा ता. संग्रामपूर

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागbuldhanaबुलडाणा