शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

दीड हजार  गुन्हेगारांना बजावले अजामिनपात्र वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:49 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार गुन्हेगारांना अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दोन हजार २०६ गुन्हेगरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार गुन्हेगारांना अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दोन हजार २०६ गुन्हेगरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे निवडणुका निर्भय व पारदर्शक वातावरणात पारपडावी यासाठी एक हजार ९७९ मतदान केंद्रावर पाच हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी १६ एप्रिल रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्यांपैकी काहींना इंरिम बॉन्ड व काहींकडून फायनल बॉन्ड लिहून घेण्यात आले अहोत. ८३६ जणांचा यात समावेश असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. दुसरीकडे ५६३ शस्त्र परवाना धारकांपैकी ५०६ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली असून उर्वरित व्यक्ती हे बँकिंग तथा तत्सम क्षेत्रात कार्यरत असल्याने तेथील सुरक्षेसाठी ती जमा करण्यात आली नसल्याचेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.निवडणुकीच्या कालावधीत १७ दिवसांच्या प्रचारादरम्यान ९७० दारूची अवैध वाहतूक व अवैध साठवणूक करणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच हजार ९०० लिटर दारू जप्त करण्यात आली असून जवळपास २३ लाख ५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दहा मार्च पासून १६ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात सहा वेळा नाकाबंदी करण्यात येऊन कोंबींग आॅपरेशन करण्यात आले आहेत.यामध्ये १६ सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांना ताब्यात घेण्यात आले असून चार फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ््यात सापडले आहेत, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान,पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान तीन हजार ७४२ वाहनांची तपासणी करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिस