शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी.

जयदेव वानखडे /जळगाव जामोदगावात जायला रस्ता नाही. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटली तरी अद्याप ज्या गावात एसटी पोहचली नाही, जेथे मुलांची भाषा शिक्षकाला कळत नाही अन शिक्षक काय म्हणतात ते मुलांना समजत नाही, अशा विपरीत परिस्थितीत जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या उंच भागावर अतिशय दुर्गम भागातल्या भिंगारा गावात राहून गेल्या २00४ पासून अध्यापनाचे काम करणारे बालाजी सुभाष निंबाळकर गुरूजी या परिसरात लोकप्रिय ठरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातला तरूण शिक्षकाची नोकरी मिळते म्हणून जेथे कोणीही जाण्यास तयार नाही अशा दुर्गम भागात जातो आणि भिंगारा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला आपलं करतो. गावात कोणत्याच सुविधा नाहीत, वीज नाही, आपली भाषा कळणारी माणसं नाही जेथे केवळ पायी अथवा दुचाकीनेच जावे लागते अशा या गावात जावून तेथे राहून विद्यार्थी घडविण्याचे काम निंबाळकर गुरूजींनी भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून गुरूजींनीच प्रथम आदिवासी भाषा अवगत केली अन् मग त्या विद्यार्थ्यांंना सुरू केले शिक्षणाचे धडे. अनंत परिश्रमानंतर आज ती शाळा आनंददायी शाळा झाली. २५२ पटसंख्या असलेल्या शाळेत गुरूजींनी लावलेली शिक्षणाची ओढ कामी आली. एकही विद्यार्थी घरी राहत नाही. दररोज शाळेत येतो, गणित, बुध्दीमत्ता, इंग्रजी, मराठी, हिंदी लिहिता वाचता आणि बोलायला शिकला. येथील विद्याथ्यराना शिकवण्यासाठी त्यांनी चित्ररूप माहिती, बोलक्या भिंती, अंक कार्डाचा वापर, गाणी, गोष्टी, खेळ, चर्चा, गटपध्दतीने निसर्गाच्या सान्निध्यात शिकविले. त्यांच्याशी ह्या नेहमीच्या संपर्कामुळे ती मुले जवळ आली, यासाठी गुरूजी तेथे वास्तव्यास असल्याने शाळेतच राहायचे त्यामुळे २४ तास शाळा विद्यार्थ्यांंंना खुली असायची. निंबाळकर गुरूजी सध्या या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. खेळातही येथील विद्यार्थी प्रवीण असून केंद्र, तालुका पातळीवर चमक दाखवितात.