शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी.

जयदेव वानखडे /जळगाव जामोदगावात जायला रस्ता नाही. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटली तरी अद्याप ज्या गावात एसटी पोहचली नाही, जेथे मुलांची भाषा शिक्षकाला कळत नाही अन शिक्षक काय म्हणतात ते मुलांना समजत नाही, अशा विपरीत परिस्थितीत जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या उंच भागावर अतिशय दुर्गम भागातल्या भिंगारा गावात राहून गेल्या २00४ पासून अध्यापनाचे काम करणारे बालाजी सुभाष निंबाळकर गुरूजी या परिसरात लोकप्रिय ठरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातला तरूण शिक्षकाची नोकरी मिळते म्हणून जेथे कोणीही जाण्यास तयार नाही अशा दुर्गम भागात जातो आणि भिंगारा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला आपलं करतो. गावात कोणत्याच सुविधा नाहीत, वीज नाही, आपली भाषा कळणारी माणसं नाही जेथे केवळ पायी अथवा दुचाकीनेच जावे लागते अशा या गावात जावून तेथे राहून विद्यार्थी घडविण्याचे काम निंबाळकर गुरूजींनी भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून गुरूजींनीच प्रथम आदिवासी भाषा अवगत केली अन् मग त्या विद्यार्थ्यांंना सुरू केले शिक्षणाचे धडे. अनंत परिश्रमानंतर आज ती शाळा आनंददायी शाळा झाली. २५२ पटसंख्या असलेल्या शाळेत गुरूजींनी लावलेली शिक्षणाची ओढ कामी आली. एकही विद्यार्थी घरी राहत नाही. दररोज शाळेत येतो, गणित, बुध्दीमत्ता, इंग्रजी, मराठी, हिंदी लिहिता वाचता आणि बोलायला शिकला. येथील विद्याथ्यराना शिकवण्यासाठी त्यांनी चित्ररूप माहिती, बोलक्या भिंती, अंक कार्डाचा वापर, गाणी, गोष्टी, खेळ, चर्चा, गटपध्दतीने निसर्गाच्या सान्निध्यात शिकविले. त्यांच्याशी ह्या नेहमीच्या संपर्कामुळे ती मुले जवळ आली, यासाठी गुरूजी तेथे वास्तव्यास असल्याने शाळेतच राहायचे त्यामुळे २४ तास शाळा विद्यार्थ्यांंंना खुली असायची. निंबाळकर गुरूजी सध्या या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. खेळातही येथील विद्यार्थी प्रवीण असून केंद्र, तालुका पातळीवर चमक दाखवितात.