शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी पसार, मुलाकडील मध्यस्थीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 11:56 IST

फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा : जळगाव जिल्ह्यातील घटनेनंतर अटकसत्र

डोणगाव (बुलढाणा) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पसार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे कळताच वधू-वर पक्षाच्या मंडळींमध्ये गोंधळ उडाला. लग्नाआधी दिलेली रक्कम वृधकडील मध्यस्थींकडून परत न मिळाल्याने वराकडील मध्यस्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यामध्ये मेहकर, डोणगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना २८ सप्टेंबरला अटक केली आहे तर एकजण फरार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील एका मुलाचे दयाराम नारायण चौधरी या समाजातील मध्यस्थी व्यक्तीने लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी डोणगाव येथील रसूल रफिक बागवान, मेहकर येथील शफउत खा जब्बर खा पठाण व भुऱ्या (अपूर्ण नाव) यांनी मेहकर येथील एका मुलीचे स्थळ सुचविले होते. डोणगाव येथे पाहणीचा कार्यक्रम झाला. पसंता- पसंती झाल्याने दयाराम चौधरी यांच्याकडून लग्न जुळवून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेऊन २६ जुलै रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. दरम्यान, २८ जुलै रोजी नवरीने शौचास जाण्याचे कारण सांगून पोबारा केला. ती परत आलीच नाही. तेव्हा वधू पक्षाकडील मध्यस्थींना नवरीला आणून द्या, नाहीतर घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली; मात्र, डोणगावातील मध्यस्थीने ते देण्यास नकार दिला. याला कंटाळून वर पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या दयाराम चौधरी यांनी २ ऑगस्ट रोजी शिदांड शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृताच्या मुलाने दिली पोलिसांत तक्रार याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी मृतकाचा मुलगा काशिनाथ दयाराम चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर वधू पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या शफउत खा जब्बार खा पठाण (रा. मेहकर), रसुल रफिक बागवान (डोणगाव) आणि भुया नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तर २८ सप्टेंबर रोजी शफत खा जब्बार खा पठाण, रसुल रफिक बागवान या दोघांना अटक केली. अद्यापही भुया हा आरोपी फरार आहे.

टॅग्स :marriageलग्नbuldhanaबुलडाणा