शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:38 PM

सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यात ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक आहे. परंतू सध्या हवामानातील आद्रता वाढल्यामुळे सोयाबीन पिकावर रोगाचे नवे संकट निर्माण झाले आहे. आद्र हवामानामुळे सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पिकापासून उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पूर्वी विदर्भातच सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक होते. मात्र आता राज्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यात नियोजीत क्षेत्रापेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर आहे. त्यापैकी ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या सर्वत पावसाचे वातावरण असल्याने या पिकाला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक झाल्याने सोयाबीन पिक रोगीष्ट बनले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या पानावर व शेंगावर त्रिकोणी, चौकोणी आकाराचे तपकिरी, करड्या रंगाचे ठिपके पडले आहेत. काही ठिकाणी रोगाची तिव्रता वाढल्याने सोयाबीनच्या झाडाची पाने व शेंगा गळून पडत आहे. हवामानातील आद्रता जस-जशी वाढत जात आहे, त्याच वेगात हा रोगही झपाट्याने वाढत आहे. सध्या सोयाबीन पिक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकावर झाल्याने शेंगा भरण्यापूर्वीच गळून पडत आहेत. पानावर छिद्रेही पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांसमोर सोयाबीन पिक वाचविण्याचे संकट आता निर्माण झाले आहे. 

 सध्या सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयाने वेळेवर फवारणी केली नसेल, तर काही ठिकाणी असा प्रकार असू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी सल्ला घेऊन वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्या.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी