शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जलक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:54 AM

खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देसातपुड्यातील सालवन येथे भेट 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.संग्रामपूर तालुक्यातील सालवन येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी आणि श्रमदान करून परतत असताना त्यांनी उपस्थित काही मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून जलसंधारण, पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. शासनाच्या आणि पाणी फाउंडेशनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र राज्यातील अनेक खेडे आणि त्या खेडे गावातील नागरिक समोर येत आहेत; मात्र राज्याची लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या  विचार केल्यास ही संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठय़ा संख्येने नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. खरं तर हे एक दैवी कार्य म्हणून  महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाने पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, एखाद्या गावात जाऊन श्रमदान करावे, एवढीच आपली प्रामाणिक इच्छा आहे. तथापि, दिवसेंदिवस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद वाढत असून, सन २0१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चार हजारापेक्षा जास्त गावे सहभागी झाली आहेत. पुढील वर्षी या संख्येत निश्‍चित भर पडेल, ही एक शुभ संकेतांची नांदी आहे, असेही आमिर खान म्हणाले. पाण्याच्या कामासाठी आपण सालवन येथे आलो असून, राज्यातील ६0-७0 गावांमध्ये आपण दौरा केल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.