शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

निसर्गासोबत जगण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:05 IST

My Earth या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल.

ठळक मुद्देप्रदुषण रोखण्यासह निसर्ग संवर्धनाचे उपक्रमराबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

खामगाव : जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण, वातावरणातील बदलांनुसार घडणाºया घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग ‘माझी वसुंधरा’ अभियानातून ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या नागरिकांना सांगितला जाणार आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जातील. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनाºयांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाºया बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.

- ६६७ संस्थामध्ये अभियानमाझी वसुंधरा अभियान राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाणार आहे. त्यामध्ये अमृत योजनेत असलेल्या २७ महापालिका व १६ अ वर्ग नगर परिषदा, नगर परिषद-२२६, नगर पंचायती-१२६ व ग्रामपंचायती-२७२ (१० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या) आहेत. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

- कामांचे होणार मूल्यमापनअभियानाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकासाठी गुण ठरले आहेत.  मूल्यांकनामध्ये प्रत्येक संस्था संवर्गातील तीन संस्थांना ५ जून रोजी बक्षिस वितरण केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावरही निवड केली जाईल. 

 

टॅग्स :khamgaonखामगावenvironmentपर्यावरण