शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बुलडाण्यात ५०पेक्षा अधिक गावांना गारपिटीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:55 IST

जिल्ह्यातील रविवारी सकाळी पाऊस व गारपीटीमुळे ५० पेक्षा अधिक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात आठ ते नऊ शेतमजूर गारपीटीमध्ये (फ्रॉस्टबाईट) जखमी झाले आहेत.

बुलडाणा : जिल्ह्यातील रविवारी सकाळी पाऊस व गारपीटीमुळे ५० पेक्षा अधिक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात आठ ते नऊ शेतमजूर गारपीटीमध्ये (फ्रॉस्टबाईट) जखमी झाले आहेत. या वादळी वा-या सह झालेल्या गारपीटीमुळे रब्बी पिकांचे जिल्ह्यात नुकसान झाले आहे.प्राथमिक स्तरावरील माहितीमध्ये रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात ही गारपीट झाली असून लोणार तालुक्यात १८ गावे, बुलडाणा तालुक्यातील अंत्रीतेली, वरवंड, पलढग, डोंगरखंडाळा, खेर्डी, चिखली तालुक्यात हातणणी, डोंगरशेवली, धोडप, चांदई, सिंदखेड राजात पिंपळखुटा, शेंदुरजन, दरेगाव, वाघाळा, संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा, सोनाळा, बोरखेड, नेकनापूर, संग्रामपूर, धामणगाव गोतमारे, करमोडा, लाडणापूर, मारोड, नांदुरा तालुक्यात हिंगणा, बोटा, इरतपूर, दादगाव, नारखेड, निमगावसह अन्य भागाला गारपिटीचा मोठा तडाखा बसला प्रारंभी १५ ते २० मिनिटे गारपीट झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागातपावसाने हजेरी लावली. संग्रामपूर तालुक्यात तर प्रारंभी बोरा एवढ्या पडणा-या गारा नंतर थेट लिंबाच्या आकाराएवढ्या पडल्याने शेतातात काम करणारे मारोड परिसरातील आठ ते दहा मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संग्रामपूर येथील  खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट केले. प्रारंभी हरबरा, बोराच्या आकाराच्या पडणा-या या गारी अचानक लिंबाच्या आकाराच्या पडू लागल्याने शेतात कामासाठी जाणा-या मजुरांना फटका बसला. या पावसामुळेगहू, हरबरा, कांदा, आंबे, द्राक्षबागांचे मोठे नुकसान केले आहे.महसूल यंत्रणा शेतातगारपिटीचा इशारा आधीच दिलेला असल्याने महसूल यंत्रणा सतर्क होती. त्यामुळे गारपिटीमुळे अधिक प्रमाणात प्रभावीत झालेल्या गावांमध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि यंत्रणा पोहोचली आहे. सोबच चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांनीही चिखली तालुक्यातील प्रभावीत भागात तहसिलदार मनीष गायकवाड यांच्यासह पाहणी केली. देऊळगाव राजा तालुक्यात तहसीलदार दीपक बाजर स्वत:कर्मचार्यांसह पाहणी करीत आहेत.६ ते १० एमएम आकाराच्या गारीसंग्रामपूरसह जिल्ह्यातील काही भागात सहा ते दहा एमएम आकाराच्या गारी पडल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतमजूरही यामुळे जखमी झालेले आहते. प्राथमिक वृत्तानुसार आठ ते दहा मजूर संग्रामपूर तालुक्यात जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. पंरतू जसजशी माहिती आपत्ती व्यवस्थापनास विभागास येत आहे तस तसे गारपिटीचे स्वरुप स्पष्ट होत आहे.२०१४ ची आठवण--आजच्या गारपिटीमुळे २०१४ मधील गारपीटीची आठवण होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१४ मध्ये तब्बल ४०२ गावात तुफान गारपीट झाली होती. यामध्ये जीवितहानीसह पशुधनाचीही मोठी हानी झाली होती. २०१४ च्या उन्हाळ्यात झालेली ही गारपीट ऐतिहासिक होती.  त्यावर्षी तब्बल ४ वेळा जिल्ह्यात गारपीट झाली होती. ४०२ गावांपैकी तब्बल ८१ गावामध्ये तीन वेळा गारपीटीचा तडाखा बसलाहोता. लोणार तालुक्यातील १७ ते १८ गावे यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधीत झाली होती. लोणारच्या सिमावर्ती भागातील एका गावात तर तापमान गारपिटीमुळे शून्य डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते तर बोरखेडी परिसरातील विहिरीत साचलेला गारांचा ढिग तब्बल चार दिवस वितळला नव्हता. बुलडाणा जिल्ह्यात १९८५ पासून गारपीट होत असल्याचे पुरावे महसूल प्रशासनाकडे आहेत. तत्कालीनजिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी व्यक्तीश: हा मुद्दा हाताळत गारपिटीचा बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास शोधून काढला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणा