शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

भारिप-बमसंकडून आमदार बळीराम सिरस्कार यांना बुलडाणा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:20 IST

बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहूजन आघाडीकडून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाची उमेदवारी जाहिर केली. 

लोकमत न्युज नेटवर्क शेगाव : आर.एस.एस वाल्यांनी महात्मा फुलेंना बेदखल केले. तीच प्रथा आजही सुरुच आहे. सर्वसामान्य जनतेची पिळवणूक थांबता थांबेना. संविधानामध्ये संतांनी सांगितलेला मार्ग असून हाच मार्ग महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला आहे.  मात्र, तेच संविधान बदलण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून  सुरु आहे.एकजुटीतून परिवर्तन घडवण्याची आज खरी गरज असल्याचे  प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. सोबतच त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहूजन आघाडीकडून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाची उमेदवारी जाहिर केली. शेगाव येथे शुक्रवारी दुपारी आयोजीत वंचित माळी समाज राजकिय एल्गार परिषदेत ते बोलत होते. माळी समाज राज्यात दोन नंबरवर असताना राजकीय पक्षांनी वाटा कमी दिला. राजकारणात दूर लोटले तसेच समाजातील इतर मागण्यांसाठी शेगांव येथे शुक्रवारी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद घेण्यात आली. उद्घाटक म्हणून राजेंद्र महाडोळे तर  प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. संतोष हुशे, अ‍ॅड. संतोष रहाटे, सुभाष सातव, श्रीराम पालकर, शंकरराव गिºहे, ज.े पी. राऊत, उमेश मसने, आशिष ढोमणे, प्रवीण वाघमारे, प्रवीण निलखान, गणेश मसने, मनोज आंबडकर, प्रवीण पेटकर अमरावती, अमोल बुरुंगले, समीर आरेकर गोंदिया, पवन तिजरे, राजेंद्र घाटे, देविदास गुरनुले, नानाजी आडे, श्रीकांत भुसारी, प्रकाश आताडकर भंडारा, गजानन ठेंगडे, वसंतराव मगर,  सदानंद माळी, मंगेश आंबडकर,  श्रीकांत ढोमणे, मिलिंद झाडे, देवानंद फुशे, रेणूकताई सिरस्कार, सौ. महाडोळे, धनंजय सिरस्कार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फुले, आंबेडकर यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राजकारणात परिवर्तनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी प्रास्ताविक मनोज आंबडकर यांनी केले. त्यानंतर  सुभाष सातव, संतोष रहाटे, प्रा. संतोष हुशे यांनी माळी समाज वंचीत असल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पेटकर तर आभार डॉ. बनकर यांनी मानले. परिषदेला माळी समाज बांधवासह राज्य भरातून आलेले भारिप बहुजन महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

सरकारने शेतकऱ्यांना छळले : बळीराम सिरस्कार भाजपा सरकार शेतकऱ्यांना त्रास देणारे सरकार असून तरुणांना व्यसनाधीन बनविण्यासाठी या सरकारने काम केले आहे. बहुजनांच्या मुलांची बौद्धिक क्षमता  कमी करण्याचे काम केले. राजकिय सत्तेत वाटा असला पाहिजे. राज्यात माळी समाज बहुसंख्येने असूनही माळी समाजाला वाटा कमी मिळत असून इतर पक्ष भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचे बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार म्हणाले. आतापर्यंत जे काही मिळाले असेल ते बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे व समाजाच्या भरभक्कम पाठींब्यामुळे मिळाले आहे. समाजाच्या भल्यासाठी ही परिषद ठेवली असून या माध्यमातून लढा उभारायचे आहे. त्यासाठी समाजाची साथ हवी असल्याचेही सिरस्कार यांनी स्पष्ट केले. 

एल्गार दिल्लीपर्यंत नेणार : राजेंद्र महाडोळे शेगांव पासून सुरू केलेला एल्गार दिल्लीच्या तक्तापर्यंत नेणार असून राजकिय भागीदारी मिळविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. इतर पक्ष समाजाला राजकारणाच्या लायकीचे समजत नाही. त्यामुळे आम्ही आता बंड पुकारले आहे. शेळी मेंढीचे जीवन जगल्या पेक्षा वाघाचे जीवन जगा असे आवाहनही समाजबांधवांना त्यांनी केले. समाजाने भीक मागणे बंद करा, न्याय मिळत नसेल तर हिसकावून घ्या असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBaliram Siraskarबळीराम सिरस्कारPoliticsराजकारण