शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : तालुक्यातील चार गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:01 IST

जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. 

ठळक मुद्देमाजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. सुबोध सावजी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बार्‍हई ता. मेहकर या गावात  क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे मुतखडा, पोटाचे विकार व किडनीचे विकार होत आहेत.  गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, गावकर्‍यांनी तक्रारी करूनसुद्धा याकडे  कुणीच लक्ष दिलेले नाही. कल्याणा ता.मेहकर येथील पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी हे  पिण्यास अयोग्य आहे, असा शासकीय अहवाल आहे आणि या पाण्यामुळे पोटाचे  विकार, अंगाला खाज येणे तसेच इतरही रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. लोणी गवळी येथे  शासकीय नळयोजनेद्वारा येणारे पाणी पिण्यास अयोग्य आहेच; परंतु इतर वापरातील  पाणीसुद्धा अंगाला खरूज होणे, अंगाला खाज सुटणे आणि इतर आजारांना निमंत्रण  देणारे ठरत आहे. मेळजानोरी या गावातील जनतेस पिण्यासाठी व वापरासाठी केवळ हात पंपाचेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या हातपंपाच्या पाण्याच्या वापराने क्षारयुक्त  पाण्यामुळे शाळकरी मुलांपासून तर गावकर्‍यांचे सर्वांचे दात किडले आहेत, तसेच  सर्वांच्याच दातांवर काळे डाग पडत आहेत. येथील जनतेने दातांच्या आजारावर १0 ते  १५ हजार रुपये खचरुनसुद्धा दातांचा आजार ‘जैसे थे’ आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी  व मुतखड्याच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन आरोग्य  पथक पाठवून जनतेचे जीवन वाचवावे, अशीही मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी  यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे. 

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासbuldhanaबुलडाणाWaterपाणी