शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

बुलडाणा : नीट न देता, बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाविषयी शिक्षकांनी ...

बुलडाणा : नीट न देता, बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाविषयी शिक्षकांनी संमिश्र तर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. नीट नसेल तर गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे यंदा राज्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापन व नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या अंतर्गत परीक्षांमध्ये गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. रविवारी नीटची परीक्षा पार पडली. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. केंद्राची नीट परीक्षा नको, अशी तेथील विद्यार्थी, पालक व शासनाने मागणी केली आणि नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिक्षकांनी, नीट परीक्षा हवीच. केवळ बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्यायला काही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, विद्यार्थ्यांनी याउलट मत केले आहे. विद्यार्थी म्हणतात की, नीट, सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश झाले पाहिजेत. यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन करून भरमसाट गुण देण्यात आले. निकालाची टक्केवारी वाढली.

अशातच बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले. गुणवंत व सक्षम विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते.

...............प्रतिक्रिया.............

विद्यार्थी काय म्हणतात...

नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत. - महेश देशमुख, विद्यार्थी.

बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.

- वैशाली इंगळे, विद्यार्थिनी

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.

..............प्रतिक्रिया.....................

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...

पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश देणे सुरू झाले ते योग्यच झाले. या वर्षी बारावी परीक्षा न झाल्याने या वर्षी नीट परीक्षे वरच प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच, परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर योग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-कॅप्टन डाॅ़ प्रशांत काेठे, प्राचार्य,जिजामाता महाविद्यालय बुलडाणा

नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची तेव्हा राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या, नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमडआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.

-संजय खांडवे, शिक्षणतज्ज्ञ.