शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

बुलडाणा : नीट न देता, बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाविषयी शिक्षकांनी ...

बुलडाणा : नीट न देता, बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाविषयी शिक्षकांनी संमिश्र तर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. नीट नसेल तर गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे यंदा राज्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापन व नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या अंतर्गत परीक्षांमध्ये गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. रविवारी नीटची परीक्षा पार पडली. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. केंद्राची नीट परीक्षा नको, अशी तेथील विद्यार्थी, पालक व शासनाने मागणी केली आणि नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिक्षकांनी, नीट परीक्षा हवीच. केवळ बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्यायला काही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, विद्यार्थ्यांनी याउलट मत केले आहे. विद्यार्थी म्हणतात की, नीट, सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश झाले पाहिजेत. यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन करून भरमसाट गुण देण्यात आले. निकालाची टक्केवारी वाढली.

अशातच बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले. गुणवंत व सक्षम विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते.

...............प्रतिक्रिया.............

विद्यार्थी काय म्हणतात...

नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत. - महेश देशमुख, विद्यार्थी.

बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.

- वैशाली इंगळे, विद्यार्थिनी

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.

..............प्रतिक्रिया.....................

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...

पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश देणे सुरू झाले ते योग्यच झाले. या वर्षी बारावी परीक्षा न झाल्याने या वर्षी नीट परीक्षे वरच प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच, परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर योग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-कॅप्टन डाॅ़ प्रशांत काेठे, प्राचार्य,जिजामाता महाविद्यालय बुलडाणा

नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची तेव्हा राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या, नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमडआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.

-संजय खांडवे, शिक्षणतज्ज्ञ.