शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:01 IST

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील बैलांची संख्या १२ टक्केने घटली असून सध्या राज्यात ९ लाख ४९ हजार १५८ बैलांचा वापर होत आहे. बैलांच्या भरवश्यावर केली जाणारी शेती आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किंमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार राज्यात ५ लाख ४१ हजार ९४४ विदेशी जातीचे तर ७६ लाख ३० हजार ९२० देशी जातीचे असे एकूण ८१ लाख ७२ हजार ८६४ बैल होते. त्यात जवळपास १२ टक्के घट होवून सन २०१२ मध्ये ४ लाख ४३ हजार ८६६ विदेशी तर ६७ लाख ७९ हजार ८४० देशी असे एकूण ७२ लाख २३ हजार ७०६ बैल होते. अशा प्रकारे सन २००७ ते २०१२ दरम्यान ९ लाख ४९ हजार १५८ बैलांची घट झाली असून जवळपास १२ टक्के घट झाल्याची दिसून येत आहे. आता पुन्हा सन २०१८ मध्ये पशुगणना सुरू होणार असून जवळपास १२ ते १५ टक्के बैलांच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यांत्रिकीकरणामुळेच बैलांची संख्या घटली

शेतीत वाढते यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे कमी वेळात होत आहेत. पेरणीपासून, डवरणी, निंदणी सारखे कामे होत असल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरला पसंती दिली आहे. त्यातच सालगड्यांची टंचाई, चारा टंचाई, बैलांच्या वाढत्या किंमती, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने अल्पभुधारक बनलेल्या शेतकºयांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शेतकºयांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणुन कामे पूर्ण करत आहेत.

पोळ्याला कृत्रीम बैलांची पूजा

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पूजा केली जात होती. मात्र, आता शेतकºयांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकºयांना मातीच्या तथा कृत्रीम बैलांची पूजा करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची प्रथा रूढ होत असून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह काही गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती