शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:01 IST

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील बैलांची संख्या १२ टक्केने घटली असून सध्या राज्यात ९ लाख ४९ हजार १५८ बैलांचा वापर होत आहे. बैलांच्या भरवश्यावर केली जाणारी शेती आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किंमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार राज्यात ५ लाख ४१ हजार ९४४ विदेशी जातीचे तर ७६ लाख ३० हजार ९२० देशी जातीचे असे एकूण ८१ लाख ७२ हजार ८६४ बैल होते. त्यात जवळपास १२ टक्के घट होवून सन २०१२ मध्ये ४ लाख ४३ हजार ८६६ विदेशी तर ६७ लाख ७९ हजार ८४० देशी असे एकूण ७२ लाख २३ हजार ७०६ बैल होते. अशा प्रकारे सन २००७ ते २०१२ दरम्यान ९ लाख ४९ हजार १५८ बैलांची घट झाली असून जवळपास १२ टक्के घट झाल्याची दिसून येत आहे. आता पुन्हा सन २०१८ मध्ये पशुगणना सुरू होणार असून जवळपास १२ ते १५ टक्के बैलांच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यांत्रिकीकरणामुळेच बैलांची संख्या घटली

शेतीत वाढते यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे कमी वेळात होत आहेत. पेरणीपासून, डवरणी, निंदणी सारखे कामे होत असल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरला पसंती दिली आहे. त्यातच सालगड्यांची टंचाई, चारा टंचाई, बैलांच्या वाढत्या किंमती, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने अल्पभुधारक बनलेल्या शेतकºयांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शेतकºयांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणुन कामे पूर्ण करत आहेत.

पोळ्याला कृत्रीम बैलांची पूजा

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पूजा केली जात होती. मात्र, आता शेतकºयांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकºयांना मातीच्या तथा कृत्रीम बैलांची पूजा करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची प्रथा रूढ होत असून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह काही गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती