शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:01 IST

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील बैलांची संख्या १२ टक्केने घटली असून सध्या राज्यात ९ लाख ४९ हजार १५८ बैलांचा वापर होत आहे. बैलांच्या भरवश्यावर केली जाणारी शेती आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किंमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार राज्यात ५ लाख ४१ हजार ९४४ विदेशी जातीचे तर ७६ लाख ३० हजार ९२० देशी जातीचे असे एकूण ८१ लाख ७२ हजार ८६४ बैल होते. त्यात जवळपास १२ टक्के घट होवून सन २०१२ मध्ये ४ लाख ४३ हजार ८६६ विदेशी तर ६७ लाख ७९ हजार ८४० देशी असे एकूण ७२ लाख २३ हजार ७०६ बैल होते. अशा प्रकारे सन २००७ ते २०१२ दरम्यान ९ लाख ४९ हजार १५८ बैलांची घट झाली असून जवळपास १२ टक्के घट झाल्याची दिसून येत आहे. आता पुन्हा सन २०१८ मध्ये पशुगणना सुरू होणार असून जवळपास १२ ते १५ टक्के बैलांच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यांत्रिकीकरणामुळेच बैलांची संख्या घटली

शेतीत वाढते यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे कमी वेळात होत आहेत. पेरणीपासून, डवरणी, निंदणी सारखे कामे होत असल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरला पसंती दिली आहे. त्यातच सालगड्यांची टंचाई, चारा टंचाई, बैलांच्या वाढत्या किंमती, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने अल्पभुधारक बनलेल्या शेतकºयांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शेतकºयांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणुन कामे पूर्ण करत आहेत.

पोळ्याला कृत्रीम बैलांची पूजा

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पूजा केली जात होती. मात्र, आता शेतकºयांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकºयांना मातीच्या तथा कृत्रीम बैलांची पूजा करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची प्रथा रूढ होत असून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह काही गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती