शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:01 IST

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील बैलांची संख्या १२ टक्केने घटली असून सध्या राज्यात ९ लाख ४९ हजार १५८ बैलांचा वापर होत आहे. बैलांच्या भरवश्यावर केली जाणारी शेती आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किंमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार राज्यात ५ लाख ४१ हजार ९४४ विदेशी जातीचे तर ७६ लाख ३० हजार ९२० देशी जातीचे असे एकूण ८१ लाख ७२ हजार ८६४ बैल होते. त्यात जवळपास १२ टक्के घट होवून सन २०१२ मध्ये ४ लाख ४३ हजार ८६६ विदेशी तर ६७ लाख ७९ हजार ८४० देशी असे एकूण ७२ लाख २३ हजार ७०६ बैल होते. अशा प्रकारे सन २००७ ते २०१२ दरम्यान ९ लाख ४९ हजार १५८ बैलांची घट झाली असून जवळपास १२ टक्के घट झाल्याची दिसून येत आहे. आता पुन्हा सन २०१८ मध्ये पशुगणना सुरू होणार असून जवळपास १२ ते १५ टक्के बैलांच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यांत्रिकीकरणामुळेच बैलांची संख्या घटली

शेतीत वाढते यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे कमी वेळात होत आहेत. पेरणीपासून, डवरणी, निंदणी सारखे कामे होत असल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरला पसंती दिली आहे. त्यातच सालगड्यांची टंचाई, चारा टंचाई, बैलांच्या वाढत्या किंमती, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने अल्पभुधारक बनलेल्या शेतकºयांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शेतकºयांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणुन कामे पूर्ण करत आहेत.

पोळ्याला कृत्रीम बैलांची पूजा

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पूजा केली जात होती. मात्र, आता शेतकºयांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकºयांना मातीच्या तथा कृत्रीम बैलांची पूजा करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची प्रथा रूढ होत असून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह काही गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती