शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मातृतीर्थ तालुक्यातच स्त्री जन्माचे प्रमाण कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:14 IST

एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुली

काशीनाथ मेहेत्रे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : मातृतीर्थ जिजाऊ मासाहेबांच्या तालुक्यातच मुलींच्या जन्मदराचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात एक हजार मुलांच्या जन्मामागे केवळ ५२१ मुली असल्याने मातृतीर्थ नगरीत बेटी बचाओ अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे गरजेचे झाले आहे. पुरुषांच्या जन्मदराच्या तुलनेत स्त्री जातीच्या जन्माचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. आरोग्य क्षेत्रातील सोनोग्राफीचे तंत्रज्ञान विकसित झाले. त्या तंत्रज्ञानामुळे गरोदर स्त्रियांच्या गर्भातील गर्भजल परीक्षण करून सदर गर्भ स्त्री किंवा पुरुष जातीचा आहे, हे समजल्यावर स्त्रीच्या गर्भातील स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्रांतर्गत किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमी म्हणजे एक हजार मुलांच्या तुलनेत फक्त ५२१ मुलींचा जन्मदर असून, मानवानेच मानवापुढे निर्माण केलेले मोठे संकट निर्माण झाले. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर सर्व विभागांना जबाबदारी देऊन स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनतेला समाज प्रबोधनाची खरी गरज आहे. भारतासारख्या प्रचंड लोकशाही असलेल्या देशात आदिमानवापासून सन २००० सालापर्यंत मुला-मुलींचे प्रमाण सारखे होते. अपंग, अंध, कुरूप असलेल्या व्यक्तींनासुद्धा त्यांचा जीवनसाथी सहजपणे मिळत असे; परंतु व्यापारी आणि नोकरदारांना चांगले दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलगी देण्यास तयार होईना. शेती विकावी लागली तरी चालेल; परंतु मुलीचे लग्न नोकरी करणाऱ्या मुलाशीच अशा हव्यासापोटी मुलांना हुंडा देण्याची प्रथा सुरू झाली. ती एवढ्या प्रमाणात वाढली, की मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च येतो, त्यापेक्षा मुलगीच नको, या भावनेतून सुरू झालेली स्त्रीभ्रूणहत्या आणि कुटुंबात मुलाला जन्म दिला तर बरे, अन्यथा कुटुंबात मुलीच जन्माला आल्या, तर त्या सुनेचा किंवा मातेचा मानसिक छळ करून मातेची हत्या, या दुष्टचक्रातून मानवापुढे मोठे संकट निर्माण झाले.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आडगावराजा, किनगावराजा, मलकापूर पांग्रा, साखरखेर्डा या चार उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावातील मुला-मुलींच्या जनगणनेच्या प्रमाणात मुलीचा जन्मदर खालावल्याचे दिसते. मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक हजार मुलांच्या प्रमाणात ९६३ मुली तर साखरखेर्डा अंतर्गत ९२२ मुली आहेत. आडगावराजा ६७२ मुली तर किनगावराजा सर्कलमध्ये सन १७-१८ सालातील तीन महिन्यांच्या अहवालात एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे. मातृतीर्थ तालुक्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याने ही समस्या गंभीर होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजप्रबोधनाची गरजबेटी बचाओ, बेटी पढाओ, नवे पर्व, नवा संकल्प अभियानाचा शासन गाजावाजा करीत आहे. दुसरीकडे गर्भजल परीक्षण करण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या लोकांची चर्चा दबक्या आवाजात ऐकण्यात येते, तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिची हेळसांड करून तिला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरिता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व समाजप्रबोधन करणे काळाची गरज आहे.मुलालाच वंशाचा दिवा न समजता मुलीला वंशाचा दिवा समजण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. - डॉ.डी.ए. मान्टेतालुका आरोग्य अधिकारी, सिंदखेडराजा.