शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मातृतीर्थ तालुक्यातच स्त्री जन्माचे प्रमाण कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:14 IST

एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुली

काशीनाथ मेहेत्रे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : मातृतीर्थ जिजाऊ मासाहेबांच्या तालुक्यातच मुलींच्या जन्मदराचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात एक हजार मुलांच्या जन्मामागे केवळ ५२१ मुली असल्याने मातृतीर्थ नगरीत बेटी बचाओ अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे गरजेचे झाले आहे. पुरुषांच्या जन्मदराच्या तुलनेत स्त्री जातीच्या जन्माचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. आरोग्य क्षेत्रातील सोनोग्राफीचे तंत्रज्ञान विकसित झाले. त्या तंत्रज्ञानामुळे गरोदर स्त्रियांच्या गर्भातील गर्भजल परीक्षण करून सदर गर्भ स्त्री किंवा पुरुष जातीचा आहे, हे समजल्यावर स्त्रीच्या गर्भातील स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्रांतर्गत किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमी म्हणजे एक हजार मुलांच्या तुलनेत फक्त ५२१ मुलींचा जन्मदर असून, मानवानेच मानवापुढे निर्माण केलेले मोठे संकट निर्माण झाले. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर सर्व विभागांना जबाबदारी देऊन स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनतेला समाज प्रबोधनाची खरी गरज आहे. भारतासारख्या प्रचंड लोकशाही असलेल्या देशात आदिमानवापासून सन २००० सालापर्यंत मुला-मुलींचे प्रमाण सारखे होते. अपंग, अंध, कुरूप असलेल्या व्यक्तींनासुद्धा त्यांचा जीवनसाथी सहजपणे मिळत असे; परंतु व्यापारी आणि नोकरदारांना चांगले दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलगी देण्यास तयार होईना. शेती विकावी लागली तरी चालेल; परंतु मुलीचे लग्न नोकरी करणाऱ्या मुलाशीच अशा हव्यासापोटी मुलांना हुंडा देण्याची प्रथा सुरू झाली. ती एवढ्या प्रमाणात वाढली, की मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च येतो, त्यापेक्षा मुलगीच नको, या भावनेतून सुरू झालेली स्त्रीभ्रूणहत्या आणि कुटुंबात मुलाला जन्म दिला तर बरे, अन्यथा कुटुंबात मुलीच जन्माला आल्या, तर त्या सुनेचा किंवा मातेचा मानसिक छळ करून मातेची हत्या, या दुष्टचक्रातून मानवापुढे मोठे संकट निर्माण झाले.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आडगावराजा, किनगावराजा, मलकापूर पांग्रा, साखरखेर्डा या चार उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावातील मुला-मुलींच्या जनगणनेच्या प्रमाणात मुलीचा जन्मदर खालावल्याचे दिसते. मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक हजार मुलांच्या प्रमाणात ९६३ मुली तर साखरखेर्डा अंतर्गत ९२२ मुली आहेत. आडगावराजा ६७२ मुली तर किनगावराजा सर्कलमध्ये सन १७-१८ सालातील तीन महिन्यांच्या अहवालात एक हजार मुलांमागे फक्त ५२१ मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे. मातृतीर्थ तालुक्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याने ही समस्या गंभीर होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजप्रबोधनाची गरजबेटी बचाओ, बेटी पढाओ, नवे पर्व, नवा संकल्प अभियानाचा शासन गाजावाजा करीत आहे. दुसरीकडे गर्भजल परीक्षण करण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या लोकांची चर्चा दबक्या आवाजात ऐकण्यात येते, तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिची हेळसांड करून तिला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरिता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व समाजप्रबोधन करणे काळाची गरज आहे.मुलालाच वंशाचा दिवा न समजता मुलीला वंशाचा दिवा समजण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. - डॉ.डी.ए. मान्टेतालुका आरोग्य अधिकारी, सिंदखेडराजा.