शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:34 IST

लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देबाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे.

- योगेश देऊळकारबुलडाणा : सध्या रब्बी हंगामातील शेतमाल शेतकºयांच्या हाती आला आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाºयांकडूनही खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे. एकंदरीतच ‘कोरोना’मुळे शेतकºयांचे अर्थचक्र बिघडले आहे. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. परतीच्या पावसाने ऐन पिक काढणीला आले असतानाच मुक्काम ठोकल्याने प्रचंड नुकसान झाले. पेरणीचा खर्चही शेतकºयांच्या हाती आला नाही. मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकºयांची रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता पूर्णपणे मिटली; असे असले तरी अनेक ठिकाणी शेतजमिनीत ओलावा जास्त राहिल्याने रब्बी हंगाम लांबणीवर गेला. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने विलंब होऊनही शेतकºयांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून शेतकºयांनी उसणवारी करून पेरणी केली. सद्य:स्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकºयांच्या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. दरम्यान, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना आपला शेतमाल विकणे अशक्य झाले आहे. खासगी व्यापाºयांनीही व्यवसाय सुरू न ठेवता खबरदरी म्हणून घरातच थांबणे पसंत केल्याने शेतकºयांसमोर खूप मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आता ‘लॉकडाऊन’ संपल्यावर  बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकºयांसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

रब्बी पिकांना गारपीटीचा तडाखारब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील काही भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट आली आहे. आता शेतमाल विक्रीविना पडून असल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी