शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:34 IST

लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देबाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे.

- योगेश देऊळकारबुलडाणा : सध्या रब्बी हंगामातील शेतमाल शेतकºयांच्या हाती आला आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाºयांकडूनही खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे. एकंदरीतच ‘कोरोना’मुळे शेतकºयांचे अर्थचक्र बिघडले आहे. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. परतीच्या पावसाने ऐन पिक काढणीला आले असतानाच मुक्काम ठोकल्याने प्रचंड नुकसान झाले. पेरणीचा खर्चही शेतकºयांच्या हाती आला नाही. मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकºयांची रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता पूर्णपणे मिटली; असे असले तरी अनेक ठिकाणी शेतजमिनीत ओलावा जास्त राहिल्याने रब्बी हंगाम लांबणीवर गेला. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने विलंब होऊनही शेतकºयांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून शेतकºयांनी उसणवारी करून पेरणी केली. सद्य:स्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकºयांच्या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे. दरम्यान, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना आपला शेतमाल विकणे अशक्य झाले आहे. खासगी व्यापाºयांनीही व्यवसाय सुरू न ठेवता खबरदरी म्हणून घरातच थांबणे पसंत केल्याने शेतकºयांसमोर खूप मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आता ‘लॉकडाऊन’ संपल्यावर  बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकºयांसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

रब्बी पिकांना गारपीटीचा तडाखारब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील काही भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट आली आहे. आता शेतमाल विक्रीविना पडून असल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी