शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

बुलढाणा जिल्ह्यात कोविड सानुग्रह निधी वाटपात घोळ!

By अनिल गवई | Updated: November 12, 2022 18:07 IST

निधी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस: निकटच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी लाटला निधी

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : कोविड विषाणू संसर्ग आजाराने मृत्युमुखी तसेच कोविड आजाराच्या निदानानंतर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या निकट नातेवाइकांना सानुग्रह निधी वाटपात प्रचंड घोळ झाल्याचे समोर येत आहे. निधी वितरणाचे दायित्व असलेल्या ‘ऑनलाइन’ वेब पोर्टलमधील अनेकांनी यात हात धुवून घेतले. आता, निकटच्या नातेवाइकांच्या पाठीमागे शासनाने सानुग्रह निधी परतीसाठी ससेमिरा लावला आहे. सानुग्रह निधी बळकाविणाऱ्यांना आता तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात येत आहेत. कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या नातेवाइकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड-१९ या आजारामुळे निधन पावली. तसेच जर त्या व्यक्तीने कोविड-१९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाइकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह साहाय्य राज्य आपत्ती निधीमधून देण्यात आले. ही मदत मिळण्यासाठी मृत व्यक्तीच्या निकट नातेवाइकाने शासनाच्या वेब पोर्टलवर आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक होते. त्यासाठी मृतकाच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी अर्ज केले. या अर्जाची पडताळणी न करताच सानुग्रह निधीचे वितरण करण्यात आले. मृतांच्या आकड्यात आणि सानुग्रह निधी वितरणात प्रचंड तफावत आढळून आली. त्यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेकडून पडताळणीनंतर एकापेक्षा अधिक सानुग्रह मदत मिळालेल्या कुटुंबातील सदस्यांना निधी परत करण्यासाठी तहसीलदारांमार्फत नोटीस बजावल्या जात आहेत.

निधी परत करण्यावरून उद्भवताहेत वाद!

कोविड आपत्तीत बाप-लेकाला, लेक-बापाला आणि नातेवाईक आप्तेष्टांना दुरावल्याची अनेक प्रकरणे पुढे आली. आजाराने मृत्युमुखी पडलेल्या कित्येकांचे अंत्यसंस्कार शासकीय यंत्रणांकडून करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतर सानुग्रह निधीसाठी मृतकाच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी आॅनलाइन अर्ज केले. मृतकाची शुश्रूषा करणाऱ्या लाभार्थ्याने की, दुसऱ्याने पैसे परत करावे? यावरून ग्रामीण भागात वाद् उद्भवत आहेत.

अनेक ठिकाणी नातेवाईक अडकले!

कोविड आपत्तीत नातेवाइकांना सानुग्रह निधी मिळवून देण्यासाठी काही एजंट समोर आले. वेब पोर्टलवर आलेल्या अर्जाची पडताळणी न करताच, राज्य शासनाने निधीचे वितरण केले. यासाठी एजंटांनी नातेवाइकांकडून काही रक्कमही हडपली. मात्र, आता पडताळणीनंतर नातेवाइकांना नोटीस मिळत आहे. आता सानुग्रह निधी लाटणारे नातेवाईकच कोंडीत सापडल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात ६९१ जणांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ९१७ जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेत. ९९ हजार २२३ जण या आजारातून बरे झालेत, तर जिल्ह्यातील ६९१ जणांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश जणांच्या एकापेक्षा अधिक निकटच्या नातेवाइकांनी सानुग्रह निधीसाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :buldhanaबुलडाणा