शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

तत्कालीन कर्जमाफीचा मलिदा काँग्रेस-राकाँने लाटला - श्‍वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:39 IST

गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले.

ठळक मुद्दे तत्कालीन सरकारने केली होती फसवी कर्जमाफीया धामधुमीत बँकांनीसुद्धा आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २00८ मध्ये फसवी कर्जमाफी करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली होती. तेव्हाच्या कर्जमाफीचा मलिदा आघाडी सरकारच्या भागीदार असलेल्या दोन्ही काँग्रेसनी व त्यांच्या हितसंबंधीयांनीच लाटला. बँकांनीसुद्धा या धामधुमीत आपले उखळ पांढरे करून घेतले. तर तेव्हाच्या कर्जमाफीच्या लाभापासून गोरगरीब शेतकरी वंचित राहिला होता, या गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. पात्र शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणारच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले आहे.गत काही दिवसांपासून चिखली बाजार समितीचे संचालक मंडळ व जि.प. सभापती श्‍वेता महाले यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. या पृष्ठभूमीवर महाले यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेला शब्द हमखास पूर्ण होणार आहे. कर्जाच्या खाईत पडलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक गरीब व पात्न शेतकर्‍याचा सात-बारा कोरा होऊन येत्या खरीप हंगामासाठी त्यांना पीक कर्ज मिळणारच आहे, तरी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडून शेतकरी बांधवांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु  नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार करून छत्नपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २0१७ सुरू केली. या योजनेद्वारे राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे सुरू आहे. यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने शब्दच्छल करून काही शेतकर्‍यांना वगळले होते. त्यामध्ये कोरडवाहू शेतकर्‍यांचा भरणा मोठय़ा प्रमाणात होता. या शेतकर्‍यांनादेखील भाजपा सरकारने कर्जमाफीत सामावून घेत दिलासा दिला आहे. असे असताना तालुक्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कर्जमाफीविषयी जनतेमध्ये संभ्रम व गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करीत महाले यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार- प्रसार व जनतेपर्यंंत लाभ पोहचवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते; परंतु त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याची टीकादेखील केली आहे. तर जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या खात्यात सुमारे ६0 कोटी रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात जमा  झाले आहेत. येत्या काळात या रकमेत आणखी वाढ होईल, अशी माहितीदेखील महाले यांनी दिली असून, पुढील खरीप हंगामात शेतकर्‍यांना नव्याने पीक कर्ज मिळणार असल्याचा विश्‍वास महाले यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल