शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

तत्कालीन कर्जमाफीचा मलिदा काँग्रेस-राकाँने लाटला - श्‍वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:39 IST

गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले.

ठळक मुद्दे तत्कालीन सरकारने केली होती फसवी कर्जमाफीया धामधुमीत बँकांनीसुद्धा आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २00८ मध्ये फसवी कर्जमाफी करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली होती. तेव्हाच्या कर्जमाफीचा मलिदा आघाडी सरकारच्या भागीदार असलेल्या दोन्ही काँग्रेसनी व त्यांच्या हितसंबंधीयांनीच लाटला. बँकांनीसुद्धा या धामधुमीत आपले उखळ पांढरे करून घेतले. तर तेव्हाच्या कर्जमाफीच्या लाभापासून गोरगरीब शेतकरी वंचित राहिला होता, या गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. पात्र शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणारच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले आहे.गत काही दिवसांपासून चिखली बाजार समितीचे संचालक मंडळ व जि.प. सभापती श्‍वेता महाले यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. या पृष्ठभूमीवर महाले यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेला शब्द हमखास पूर्ण होणार आहे. कर्जाच्या खाईत पडलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक गरीब व पात्न शेतकर्‍याचा सात-बारा कोरा होऊन येत्या खरीप हंगामासाठी त्यांना पीक कर्ज मिळणारच आहे, तरी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडून शेतकरी बांधवांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु  नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार करून छत्नपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २0१७ सुरू केली. या योजनेद्वारे राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे सुरू आहे. यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने शब्दच्छल करून काही शेतकर्‍यांना वगळले होते. त्यामध्ये कोरडवाहू शेतकर्‍यांचा भरणा मोठय़ा प्रमाणात होता. या शेतकर्‍यांनादेखील भाजपा सरकारने कर्जमाफीत सामावून घेत दिलासा दिला आहे. असे असताना तालुक्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कर्जमाफीविषयी जनतेमध्ये संभ्रम व गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करीत महाले यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार- प्रसार व जनतेपर्यंंत लाभ पोहचवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते; परंतु त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याची टीकादेखील केली आहे. तर जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या खात्यात सुमारे ६0 कोटी रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात जमा  झाले आहेत. येत्या काळात या रकमेत आणखी वाढ होईल, अशी माहितीदेखील महाले यांनी दिली असून, पुढील खरीप हंगामात शेतकर्‍यांना नव्याने पीक कर्ज मिळणार असल्याचा विश्‍वास महाले यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल