शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘समृद्धी’साठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:41 IST

ज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी एकूण सात हजार २९० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे.त्यापैकी जवळपास ८३ टक्के जमीन जून अखेर पर्यंत सरळ खरेदीद्वारे मुल्यांकनाच्या पाचपट मोबदला देऊन घेण्यात आली होती.

- नीलेश जोशी

बुलडाणा : विदर्भ, मराठवाड्यास थेट मुंबईला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी म्हणून गणल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या राज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे. तशी अधिसुचनाही तीन आॅगस्ट रोजी काढण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी एकूण सात हजार २९० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. त्यापैकी जवळपास ८३ टक्के जमीन जून अखेर पर्यंत सरळ खरेदीद्वारे मुल्यांकनाच्या पाचपट मोबदला देऊन घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या सरळ खरेदीमध्ये बुलडाणा जिल्हा हा त्यावेळी राज्यात अव्वल ठरला होता. दरम्यान, उर्वरित १२३३ हेक्टरपैकी बुलडाणा जिल्ह्यातील १२७ हेक्टर जमीन अद्याप खरेदी करणे बाकी आहे. मात्र आता ही जमीन थेट महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तिचे अवॉर्ड करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जी जमीन खरेदी करण्याचे राहलेली आहे ती न्यायप्रविष्ठ प्रकरणे, वारसा हक्काचे आपसी वाद व तत्सम कारणांनी राहलेली आहे. त्यामुळे अशा प्रकरणात बाजार मुल्याच्या चार पटच मोबदला देण्यात येणार असून तो प्रसंगी न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये थेट न्यायालयात जमा करण्यात येईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. या उपरही आपसी वाद सामंजस्याने मिटवून जमीनीचे संमतीपत्र दिल्यास त्या प्रकरणात बाजार मुल्याच्या पाच पट मोबदला देण्याची शासनाची भूमिका असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आली असून त्यापोटी ६५० कोटी रुपयांचा मोबदला आतापर्यंत संबंधीत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत अनुषंगीक बैठकही घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.

प्रकरणे एसडीओकडे वर्ग

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू झाल्याने आता भूसंपादनाच्या १८(१) च्या नोटीस बजावणे तथा संबंधित प्रकरणामध्ये अवॉर्ड जाहीर करण्यची प्रक्रिया ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर होणार आहे. त्यानुषंगाने समृद्धी महामार्गासंदर्भातील प्रकरणे ही मेहकर आणि सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. अवॉर्ड करणे कलम १८ (१) च्या नोटीस बजावण्याची कामे तेथूनच होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग