शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra CM :मुंबईतील राजकीय नाट्यात डॉ. राजेंद शिंगणे केंद्रबिंदू!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 19:19 IST

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत झालेला घटनाक्रम विषद केल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावाचीच चर्चा सर्वत्र होती.

बुलडाणा: मुंबईत शनिवारी झालेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय नाट्यात माजी मंत्री तथा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आ. डॉ. राजेंद शिंगणे हे केंद्रबिंदू ठरल्याचे समोर येत आहे. राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत झालेला घटनाक्रम विषद केल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावाचीच चर्चा सर्वत्र होती. दरम्यान, असे असले तरी बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुर्तास तरी शांतता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही सध्या मुंबईमध्येच डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत आहे. शांत संयमी आणि राजकीय घडामोडींची अचूक नस ओळखणाºया डॉ. शिंगणेंनी प्रथम अजित पवार यांच्या सोबत जात नंतर पुन्हा शरद पवार यांच्या गोटात प्रवेश केल्याचे बोलल्या जात असले तरी आपणास झालेल्या घटनाक्रमाची माहिती नव्हती. जसजसा घटनाक्रम घडला तसे याचे आकलन झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण शरद पवार यांच्या सोबत असून शेवटपर्यंत राहू, अशी भूमिकाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान गुरूवारपासून मुंबईत ठाण मांडून बसलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा बुलडाण्यात मात्र शुक्रवारी दुपारपासून कोणाशीही संपर्क झालेला नाही. गेल्या ३५  वर्षापासून राजकारणात असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे हे पाच वेळा आमदार राहलेले असून आघाडी शासनामध्ये दहा वर्षे त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबीनेटमंत्री म्हणून काम पाहले होते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते एक परिपक्व नेते म्हणूनही ओळखले जातात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्येही त्यांचा सहभाग राहलेला आहे. त्यामुळे प्रारंभी अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर उपस्थित राहून नंतर पुन्हा शरद पवार गोटात डॉ. शिंगणे आल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

घाईघाईत गाठली होती मुंबई

सत्ता स्थापनेच्या या नाट्यात अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असले तरी शनिवारी पहाटे झालेल्या घडामोडींची ही बºयाच आधीपासून पूर्वतयारी केली गेली असल्याचे संकेत आहे. खुद्द माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांंनाही चार दिवसापूर्वीच तातडीने मुंबईत दाखल होण्याच्या सुचना मिळाल्या होत्या. अर्थात त्यांना कोणी बोलावले होते हे स्पष्ट नसले तरी ज्या घाईने डॉ. शिंगणे मुंबईत दाखल झाले होते, त्यावरून या घटना घडामोडींना काही दिवसापूर्वीच मुर्त स्वरुप दिल्या गेल्याचे स्पष्ट होत आहे.  त्याची बºयापैकी कुणकुणही डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लागलेली होती अशी चर्चाही बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.

आपल्यासाठी मोठा धक्का

अजित पवार यांंनी राजभवनात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा डॉ. राजेंद्र शिंगणेही त्यांच्या समवेत होते. मात्र त्यानंतर त्यांनी तेथून थेट शरद पवार यांचे सिल्वहर ओकमधील निवास्थान गाठले होते. शनिवारी झालेली ही घडामोड आपल्या ३५ वर्षाच्या राजकारणातील सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट होती, अशी भावनाही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेbuldhanaबुलडाणाNCPराष्ट्रवादी काँग्रेस