शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:48 IST

लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देसरोवरातील पाण्याने गत १८ वर्षातील सर्वात कमी पातळी गाठली आहे. सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली.नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे.

- रहेमान नवरंगाबादी लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. सरोवरातील पाण्याने गत १८ वर्षातील सर्वात कमी पातळी गाठली आहे. पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली.लोणार सरोवरावरील संकटे थांबण्याची चिन्हे नाहीत. सरोवराला येऊन मिळणारे पाचपैकी दोन प्रमुख नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. लोणारच्या झऱ्यांचा स्रोत असणाºया भूजलाचा बेकायदा उपसा सुरू असल्यामुळे ही स्थिती उदभवल्याचे समोर येत आहे. उपग्रहीय छायाचित्रे आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे केलेल्या पाहणीतून २०१४ च्या तुलनेत लोणार सरोवराचे पाणी पसरट भागात तब्बल २०० ते ३०० मीटरने मागे गेले आहे. गेल्या दोन वर्षांत कमी पाऊस झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष पावसाच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. २००१ ते २०१६ या कालावधीत लोणारच्या पावसात कोणताही बदल झालेला नसल्याचे राज्य सरकारच्या पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गेल्या सोळा वर्षांपैकी २००३ मध्ये ४८४ मिलीमीटर तर २००४ मध्ये ४७३.७ मिलीमीटर हा सर्वात कमी पाऊस लोणारमध्ये नोंदवला गेला होता. मात्र, त्या दोन्ही वर्षी लोणार सरोवराचे पाणी सर्वोच्च पातळीवर होते. गेल्या तीन वर्षांत लोणारमध्ये ५१० मिलीमीटर (२०१४), ५४६ मिलीमीटर (२०१५) आणि ७९४ मिलीमीटर (२०१६) पावसाची नोंद झाली. लोणारच्या सरासरी पावसापेक्षा हा पाऊस जास्त आहे. तरीही लोणार सरोवराचे पाणी सर्वांत कमी पातळीवर पोचले आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण असल्यामुळे जमिनीवरील पाणी आटत आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.१९७२ च्या दुष्काळात आटले होते पाणी१९७२ च्या दुष्काळामध्ये निसर्गनिर्मित जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे खारे पाणी पूर्णपणे आटले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी सरोवरातील तयार होणारा खार आणून विक्री केला होता. आता तशी परिस्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न सरोवर प्रेमी करीत आहे. सरोवराला येऊन मिळणारे नैसर्गिक सर्व झरे आटल्याने पाणीसाठा घटत चालला आहे. ही बाब गंभीर असून सरोवराच्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाLonarलोणार