शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विजेअभावी पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:48 IST

मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे.   सध्या सुरळीत स्वरूपात वीजही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, कपाशी ही पिके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे; मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्‍याचदा वीज प्रवाह बंद असतो. मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन-तीन वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. नोटबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हातून जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात होत आहे नुकसानअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते, बाभुळखेड येथील शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्‍यांनी सुरळीत वीज पुरवठय़ाची मागणी केली आहे.

कर्मचार्‍यांची कमतरता; रोहित्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेसंदर्भातील कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्‍यांना, शेतकर्‍यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहित्र जळाल्यास त्वरित शेतकर्‍यांना ते बदलून मिळत नाही. खामगाव येथून वीज रोहित्र आणण्यासाठी शेतकर्‍यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड होत आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनFarmerशेतकरी