शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

विजेअभावी पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:48 IST

मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे.   सध्या सुरळीत स्वरूपात वीजही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, कपाशी ही पिके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे; मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्‍याचदा वीज प्रवाह बंद असतो. मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन-तीन वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. नोटबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हातून जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात होत आहे नुकसानअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते, बाभुळखेड येथील शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्‍यांनी सुरळीत वीज पुरवठय़ाची मागणी केली आहे.

कर्मचार्‍यांची कमतरता; रोहित्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेसंदर्भातील कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्‍यांना, शेतकर्‍यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहित्र जळाल्यास त्वरित शेतकर्‍यांना ते बदलून मिळत नाही. खामगाव येथून वीज रोहित्र आणण्यासाठी शेतकर्‍यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड होत आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनFarmerशेतकरी