शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

विजेअभावी पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:48 IST

मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे.   सध्या सुरळीत स्वरूपात वीजही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, कपाशी ही पिके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे; मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्‍याचदा वीज प्रवाह बंद असतो. मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन-तीन वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. नोटबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हातून जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात होत आहे नुकसानअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते, बाभुळखेड येथील शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्‍यांनी सुरळीत वीज पुरवठय़ाची मागणी केली आहे.

कर्मचार्‍यांची कमतरता; रोहित्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेसंदर्भातील कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्‍यांना, शेतकर्‍यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहित्र जळाल्यास त्वरित शेतकर्‍यांना ते बदलून मिळत नाही. खामगाव येथून वीज रोहित्र आणण्यासाठी शेतकर्‍यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड होत आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनFarmerशेतकरी