जीवन प्राधिकरणने लावली कोट्यवधींच्या रस्त्यांची वाट
By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:19:56+5:302014-06-07T23:45:11+5:30
पुर्ण झालेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांना जीवन प्राधीकरणने पाईपलाईनच्या कामासाठी उकरून काढले आहे.

जीवन प्राधिकरणने लावली कोट्यवधींच्या रस्त्यांची वाट
शेगाव : शेगाव शहरात २00९ पासुन शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांची कामे चालु आहे. यापैकी पुर्ण झालेल्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांना जीवन प्राधीकरणने पाईपलाईनच्या कामासाठी उकरून काढले आहे. त्यामुळे होत असलेल्या नुकसानाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शेगाव शहरात महाराष्ट्र शासनाने ३५0 कोटी रूपयांचा शेगाव विकास आराखडा वर्ष २00८ मध्ये मंजुर केलेले असून त्यानुसार शहरातील विविध कामांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. शहरातील मुख्य रस्ता म्हणजेच मेनरोड हा १ वर्षापुर्वी कोल्हापूर येथील कंत्राटदार कंपनीने पुर्ण केला असून ज्या रस्त्यावर एकुण ४ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे आरडी १ हा रस्ता रेल्वे स्टेशनपासुन मंदीराला जोडणारा आहे. तसेच शहरातून बाळापुरकडे जाणार्या चौफुलीवर 00 ते 00.३ हा रस्ता सुध्दा पुर्ण झालेला असून त्यावर ४.५ कोटी कोटी व ३.५ कोटी एवढे खर्च करण्यात आला आहे. संबधीत कंत्राटदार हे काम पुर्ण करून गेला आहे. मात्र, आता जीवन प्राधीकरणने या दोन्ही ठिकाणी पाईपलाईन साठी खोदकाम करून रस्ता उकरून काढलेला आहे. सदरहू रस्ता जेसीबी लावून उकरण्यात आल्यामुळे त्याठिकाणची वाहतूक व रहदारी सुध्दा काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. हे दोन्ही रस्ते पुर्ण करावयास जवळपास दोन ते अडीच वर्षे लागलेली असून सदरहू कामे त्या आधी करावयाची जबाबदारी जीवनप्राधिकरणाची होती. परंतु ही कामे त्यावेळी न करता आता रस्ता उकरून पुन्हा करणे म्हणजेच कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)