शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मजुरांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:41 IST

लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. 

ठळक मुद्देलोणार तालुक्यात हंगामी वसतिगृह सुरू हजारो मजुरांचे कामासाठी स्थलांतरण 

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. लोणार तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झालेले आहे, तसेच तालुक्याला दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्यामुळे आणि शासन स्तरावर गावात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी हजारो मजूर जातात. माय-बाप घर संसाराचा गाडा हाकण्यासाठी बाहेर गावी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार गटशिक्षणाधिकारी एस.आर. चव्हाण यांच्या निदर्शनास आला.  गावात कोणी सांभाळ करण्यास  नसल्यामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी जात असल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी गटशिक्षणाधिकाºयांनी  केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील टिटवी, गोत्रा, खुरमपूर याठिकाणी हंगामी वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. याबाबत गोदावरी कोकाटे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला असून, गटशिक्षणाधिकाºयांच्या प्रयत्नांमुळे १ मार्चपासून दोन वेळेच्या जेवणाची सोय झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच भगवान कोकाटे, गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, केंद्रप्रमुख जंगलसिंग राठोड, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व गावकरी उपस्थित होते. हंगामी वसतिगृह सुरू करण्याच्या या उपक्रमामुळे मजुरांच्या पाल्यांना मोठा आधार झाला असून, यामुळे त्यांच्या शिक्षणातही सातत्य राहणार आहे.  

टॅग्स :LonarलोणारStudentविद्यार्थी