खामगाव शहर सौंदर्यीकरणाचे तीनतेरा !
By Admin | Updated: June 12, 2014 20:52 IST2014-06-12T20:48:53+5:302014-06-12T20:52:08+5:30
‘बांधा आणि जाहीरात करा’ या तत्वानुसार खामगाव शहरात विविध ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली.

खामगाव शहर सौंदर्यीकरणाचे तीनतेरा !
खामगाव : ह्यबांधा आणि जाहीरात कराह्ण या तत्वानुसार खामगाव शहरात विविध ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली. शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ व्हावी या उदात्त हेतुने राबविलेल्या या योजनेकडे नगर पालिका प्रशासन व संबंधित चौकाचे सौंदर्यीकरण दायित्व स्विकारलेल्या सामाजिक संस्था अथवा ग्रुपने दुर्लक्ष केल्याने ही योजना धुळखात पडून आहे. परिणामी शहर सौंदर्यीकरण योजनेचे ह्यआता वाजले की बाराह्ण म्हणण्याची वेळ आली आहे.
खामगाव शहर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. येथे शुध्द चांदीच्या खरेदीसाठी दुरूदूरून लोक येत असल्याने खामगावची ह्यरजत नगरीह्ण म्हणूनही ओळख आहे. कापसाची बाजारपेठ, धान्य बाजार यासाठीही खामगावचा नावलौकीक आहे. सद्यास्थितीत शहराचा विस्तार चांगलाच वाढला असून एक लाखाच्या जवळपास लोकसंख्या पोहचली आहे. घाटाखाली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून खामगावकडे पाहीले जात असल्याने शहरात येणार्यांची गर्दी वाढतच आहे. शहरात दुरूदूरून लोक येत असल्याने त्यांच्या मनात शहराची १0-१२ वर्षापुर्वी तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश बोखड यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना नगर पालिकेने तयार केली. प्रायोजकांच्या माध्यमातून ह्यबांधा आणि जाहीरात कराह्ण असे या योजनेचे प्रारूप तयार करण्यात आले. त्यानंतर शहरातील महत्वाचे चौक सौंदर्यीकरणासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, ग्रुप वा वैयक्तिक जाहीरातीसाठी देण्यात आले. या योजनेला शहरातील अनेकांनी दायित्व स्विकारून चौकांचे सौंदर्यीकरणाची जबाबदारी घेतली.
या योजनेनुसार शहरातील बसस्टॅण्ड चौक, टिळक पुतळा, विकमसी चौक, टावर चौक, रायगड कॉलनी कॉर्नर, जलंब नाका, रेल्वे स्टेशन मार्ग योसाबत इतरही ठिकाणी मुख्य चौकात सौंदर्यीकरण करण्यात आले. काही दिवस हे चौक सुंदर व मनाला मनमोहक वाटत होते. बाहेरगावाहून येणार्या नागरीकांचे या सौंदर्यीकरणाकडे लक्ष वेधून जात होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी बोखड यांची बदली झाली आणि पुढील सर्व योजना बारगळली. या गोष्टीला १0 ते १२ वर्ष उलटून गेली. यादरम्यान नगर पालिकेचे वेळोवेळी सत्तांतर झाले. अधिकारी, पदाधिकारी बदलले मात्र या योजनेकडे कोणीच ढुंकुनही पाहले नाही. त्यामुळे सौंदर्यीकरण योजनेत लावलेल्या शिल्पांचे भग्न अवशेष तर कुठे गवत वाढल्याचे चौकाचौकात दिसत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणार्या या योजनेला पुनरूज्जीवन मिळण्याची मागणी नागरीकामधून होत आहे.