शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:29 IST

सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.

ठळक मुद्देराहेरी बु. येथे पार पडला नामांतर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन कोरेगाव भीमासारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.या नामांतर स्मृती सोहळय़ाला माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, रिपाइं युवा नेते जयदीप कवाडे, चरणदास इंगोले, गोपाल आटोटे, सभापती राजू ठोके, राजाभाऊ सावळे, मनोज कायंदे, रजनी कवाडे, विजय गवई, सचिन शिंगणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, सागर कुळकर्णी, प्रतिभा कवाडे यांसह रिपाइंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रा.कवाडे म्हणाले की, आजचे सरकार हे भाजप-सेनेचे नसून सर्व निर्णय आरएसएस घेत आहे. हे लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात. ज्यांना संविधान कळालेच नाही, तेच लोक ही भाषा बोलतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर करताना लोकशाही दिली. कितीही o्रीमंत व्यक्ती असला तरी त्यालाही एकाच मताचा अधिकार दिला. या भारत देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात, त्यांना तोडण्याचे काम विदेशी शक्तीने अनेक वेळा केले; परंतु संविधानामुळे हा भारतदेश एकसंघ राहिला. त्यामुळे संविधान बदलने म्हणजे बायका बदलण्याचा खेळ नव्हे, असेही उद्गार त्यांनी काढले. कोरेगाव   भीमा प्रकरणात दलित समाजावर दरोड्यासारखे, ३0७ सारखे गुन्हे दाखल करून कोम्बिंग ऑपरेशन करीत अटकसत्र सुरु केले आहे, हे त्वरित थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी केली. त्यांनी शब्द दिला ते पाळतील, अन्यथा २६ फेब्रुवारीला हिवाळे अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलनही रिपाइं जनता करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.प्रारंभी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाचे १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना दिलासा दिल्याचे सांगितले, तर कोरेगाव भीमाची दंगल ही पूर्वनियोजित होती, हे माझ्या मित्राकडून कळाले. २00 वर्षात कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली नाही, ती आता कशी! असा प्रश्नदेखील उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रिपाइंचे युवा नेते जयदीप कवाडे म्हणाले की, दंगलखोर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, आमचे काही नेते कटोरा हातात घेऊन त्यांची लाचारी पत्करतात, ही लाचारी रिपब्लिकन जनता सहन करणार नाही, असे म्हणाले.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाJogendra kawadeजोगेंद्र कवाडे