शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण ‘आरएसएस’चे षड्यंत्र - कवाडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:29 IST

सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.

ठळक मुद्देराहेरी बु. येथे पार पडला नामांतर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन कोरेगाव भीमासारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्यंत्र आहे, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर स्मृती सोहळय़ानिमित्त आज राहेरी बु. येथे केला.या नामांतर स्मृती सोहळय़ाला माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, रिपाइं युवा नेते जयदीप कवाडे, चरणदास इंगोले, गोपाल आटोटे, सभापती राजू ठोके, राजाभाऊ सावळे, मनोज कायंदे, रजनी कवाडे, विजय गवई, सचिन शिंगणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, सागर कुळकर्णी, प्रतिभा कवाडे यांसह रिपाइंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रा.कवाडे म्हणाले की, आजचे सरकार हे भाजप-सेनेचे नसून सर्व निर्णय आरएसएस घेत आहे. हे लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात. ज्यांना संविधान कळालेच नाही, तेच लोक ही भाषा बोलतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर करताना लोकशाही दिली. कितीही o्रीमंत व्यक्ती असला तरी त्यालाही एकाच मताचा अधिकार दिला. या भारत देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात, त्यांना तोडण्याचे काम विदेशी शक्तीने अनेक वेळा केले; परंतु संविधानामुळे हा भारतदेश एकसंघ राहिला. त्यामुळे संविधान बदलने म्हणजे बायका बदलण्याचा खेळ नव्हे, असेही उद्गार त्यांनी काढले. कोरेगाव   भीमा प्रकरणात दलित समाजावर दरोड्यासारखे, ३0७ सारखे गुन्हे दाखल करून कोम्बिंग ऑपरेशन करीत अटकसत्र सुरु केले आहे, हे त्वरित थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी केली. त्यांनी शब्द दिला ते पाळतील, अन्यथा २६ फेब्रुवारीला हिवाळे अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलनही रिपाइं जनता करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.प्रारंभी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाचे १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना दिलासा दिल्याचे सांगितले, तर कोरेगाव भीमाची दंगल ही पूर्वनियोजित होती, हे माझ्या मित्राकडून कळाले. २00 वर्षात कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली नाही, ती आता कशी! असा प्रश्नदेखील उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रिपाइंचे युवा नेते जयदीप कवाडे म्हणाले की, दंगलखोर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, आमचे काही नेते कटोरा हातात घेऊन त्यांची लाचारी पत्करतात, ही लाचारी रिपब्लिकन जनता सहन करणार नाही, असे म्हणाले.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाJogendra kawadeजोगेंद्र कवाडे