जयदेव वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७ ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप यांचा नंबर लागतो. ग्रामीण भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.प्रथमच थेट जनतेमधून सरपंच पदाची निवड करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण राजकारणाने चांगलेच पेटले होते. संपूर्ण गावामधून सरपंच निवड हा विशेष औत्सु क्याचा विषय बनला होता. त्यामुळे गावागावात प्रचंड उत्साहात आणि जादा टक्केवारीने मतदान झाले. सरसरी संपूर्ण तालुक्यात ८४ टक्के एवढे मतदान झाले. त्यातच गावामधून सरपंच निवडायचा म्हणून मतदारांनीदेखील जनमानसामध्ये चांगली प्र ितमा असलेल्या व्यक्तींनाच मतदान केले. अखेर ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन धक्कादायक परिणाम बाहेर आले. तालुक्यामध्ये माहुली, गाडेगाव बु., टाकळी, भेंडवळ खुर्द, मडाखेड बु., मडाखेड खुर्द, गोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, हिंगणा बाळापूर, झाडेगाव, पळशी वैद्य, मांडवा, सातळी, पळसखेड, वडगाव पाटण, खेर्डा खुर्द, निंभोरा बु., बोराळा बु., बोराळा खुर्द या १९ गावांनी निवडणुका लढल्या. त्यात वडगाव पाटण सरर पंच पद रिक्त राहिले तर १९ गावामध्ये प्रभागनिहाय सदस्यांची तर सरपंचाची थेट जनतेतून निवड झाली. तालुक्यातील चारही जि.प. सर्कलमध्ये भाजपाचे सदस्य असून, पंचायत समि तीवरदेखील भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर भाजपाचेच अधिराज्य राहिले असे वाटत होते; मात्र निवडणुकांचे परिणाम पाहता काँग्रेसने पुन्हा आपली पकड ग्रामीण भागावर पक्की केल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास १0 ठिकाणी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्या तरी प्रत्येक गावामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेसचा गट एकमेकांविरुद्ध होता.
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!तालुक्याच्या राजकारणात काम करणारे पदाधिकारी नेते मंडळींनी ग्रामीण भागातील असल्याने आपसूकच त्या-त्या पदाधिकार्यांवर आपल्या गावातील सरपंच पदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकांना चांगलीच रंगत आली. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या की वाद, भांडणे आलीच वार्डा-वार्डात एका कुटुंबातील व्यक्ती परस् पराविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात आणि मग वाद होतात; परंतु यावर्षी कोणत्याही गावात निवडणुकीच्या कारणावरून वाद झाल्याची नोंद नाही.