शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

चिखलीत मराठा समाजातील आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 19:04 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले.

बुलडाणा -  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतले.सकल मराठा समाजाच्यावतीने चिखलीत २४ जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत आरक्षणासाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा संकल्प करून सकल मराठा समाजाच्यावतीने शहराला लगूनच असलेल्या वायझडी धरणामध्ये पाण्यात उतरून मराठा समाजबांधवांच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले याआंदोलनाची बातमी सर्वत्र पसरताच आंदोलनस्थळी पोलीसांनी धाव घेतली.दरम्यान ठाणेदार महेंद्र देशमुख, नायब तहसिलदार झाल्टे यांच्या उपस्थित आंदोलनकर्ते प्रशांत ढोरे  पाटिल, दत्ता सुसर, बंडु नेमाने, संजय कदम, निलेश लोखंडे, भगवान देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कार्यकरत्यांनी प्रचंड  घोषणा बाजी करून परीसर दणाणून सोडला होता. यावेळी कपील खेडेकर, विनायक सरनाईक, बंटी लोखंडे, शरद चिंचोले, अनिल गोराडे, बिट्टु देशमुख, संतोष देशमुख, पवण म्हस्के, बंडु नेमाने, शैलेश अंभोरे, दिपक सुरडकर, शैलेश डोणगावकर, शुभम खेडेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान धरणात उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कलम  १०७ नुसार कारवाई करून अटक केली व जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnewsबातम्या