शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:37 PM

सत्तेत सोबत असतानाही भाजपची स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.

बुलडाणा: अलिकडील काळात राजकारणाची व्याख्या बदलत असून तत्व पाळल्या जात नसल्याची खंत शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. बुलडाणा येथे औपचारिक भेटीवर ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. दरम्यान, भाजपशी  त्यावेळी जुळवून घेणे अत्यंत अवघड झाले होते. सत्तेत सोबत असतानाही भाजपी स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.सातत्याने भाजपकडून दिला जाणारा दुजाभाव पाहता अखरे शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यावी लागली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीएएला शिवसेनेचा विरोध नाही पण एनआरसीमध्ये नंतर टाकण्यात आलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत. त्याबाबात भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे ते म्हणाले.अमरावतीच्या राजकारणात सक्रीयच असून तेथे आपला फोकस कायम आहे. निश्चलीकरणामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या. सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच अडचणी आल्या व अर्थचक्राला फटका बसला, अद्याप त्यातून आपण वर आलो नाही, असे सांगत बेरोजगारी वाढली आहे. उद्योग बंद पडले आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असले तरी जिडीपी साडेचार ते पाच टक्क्यावर जात नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेते सर्व आलबेलबुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याबाबत त्यांना छेडले असता प्रथमत: या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेची पूर्वीचीच ताकद कायम आहे. दोन आमदार, एक खासदार येथे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत असे वाद नाही, असेच त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्यात आपण प्रदीर्घ काळ खासदार होता. बुलडाण्यात मिळालेले प्रेम आणि येथील सांस्कृतिक वारसा हा माणुसकीचा आहे. आज अन्यत्र परिवर्तन होत असले तरी बुलडाणेकरांनी आपल्यातील माणुसकी टिकवून ठेवली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळBJPभाजपाShiv Senaशिवसेना