शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

...या भूमीत लिहिले गेले ‘महाराष्ट्र गीत’; गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:53 IST

श्री. कृ. कोल्हटकरांच्या स्मारकाची प्रतीक्षाच; सरकार बदलल्याने जागेचा प्रस्ताव थंडबस्त्यात

 नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद (जि. बुलढाणा): महाराष्ट्राचे अत्यंत समर्पक व यथार्थ वर्णन विनोदी साहित्याचे जनक तथा ज्येष्ठ नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतातून केले. हे महाराष्ट्र गीत १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही या साहित्य सम्राटाच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर सरकार बदलल्याने ती थंडबस्त्यात आहे.  

जळगाव शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयास  १९७१ ला  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत श्रीपाद कृष्णांचे नाव दिले गेले. एवढीच स्मृती जळगावात आहे.  

आयुष्याची महत्त्वपूर्ण पंधरा वर्षे जळगावात  श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे सन १९१८मध्ये खामगाववरून जळगाव जामोद येथे आले. आयुष्याची शेवटची पंधरा वर्षे त्यांनी जळगावच्या भूमीत घालविली. या काळात त्यांनी प्रचंड साहित्य लेखन करून ‘विनोदाचार्य’ ही उपाधी मिळविली. सन १९३३ पर्यंत त्यांचे वास्तव्य जळगावात होते. प्रकृती बिघडल्याने ते पुणे येथे गेले आणि १ जून १९३४ रोजी त्यांचा  मृत्यू झाला. 

महाराष्ट्र गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे महाराष्ट्र गीतात त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीचे, मानवी स्वभावाचे, पराक्रम गाजविणाऱ्या मराठ्यांचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यामुळेच ९७ वर्षांनंतरही मोठ्या दिमाखाने हे गीत गायले जाते.  परंतु, हे गीत ज्या भूमीत लिहिले गेले, त्या जळगावची साधी आठवणसुद्धा राज्यकर्त्यांना होत नाही.