शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:56 IST

शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसाने झालेल्या नुकसानाच्या संकटसमयी शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी पुढील तीन दिवसात पूर्ण करून शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते. विमा काढलेल्या शेतकºयांचे नुकसानाचे अर्ज कृषी मित्रांमार्फत गावातच भरून घेण्याचे सूचित करीत पालकमंत्री कुटे म्हणाले, शेतकºयांनी पीक विम्याचे नुकसानाचे अर्ज भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी व मका पिकाची १०० टक्के हानी झाली आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे. पंचनामे करताना अतीतपशीलवार न जाता सरसकट पूर्ण करावे. नुकसान झालेल्या तूर पिकाचा विमा काढला असल्यास कंपन्यांनी नुकसान ग्राह्य धरून तूर उत्पादक शेतकºयांनाही मदत द्यावी. सर्वे करताना अतिवृष्टी हा निकष नाही. त्यामुळे महसूल मंडळ अतिवृष्टीग्रस्त आहे काय, या निकषाचा विचार करू नये. हा अवकाळी पाऊस असल्यामुळे या नुकसानासाठी सदर निकष लागूच होत नाही. ते पुढे म्हणाले, ज्या शेतकºयांनी संबंधित पिकाचा विमा काढला आहे, त्यांना पिक विम्याची व एनडीआरएफची मदत अशी दोन्ही मिळणार आहे. ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रबंधनाकडून मिळणारी मदत मिळेल. त्यामुळे कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.नुकसान झालेल्या शेतकºयांना परिपूर्ण आर्थिक मदत देण्यात येईल. विमा कंपनी व प्रशासनाने सहकार्याने पंचनामे पूर्ण करून शेतकºयांना मदत मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विमा न काढलेल्या पिकांचेही पंचनामे पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सिंदखेड राजा तालुक्यातील कोहळ येथील रवी बाबुराव गायकवाड (३३) व नारायण संतोष गायकवाड (३१) हे दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्यांच्या कुटंबीयांना तातडीने मदत देण्यात यावी. पावसाने पडझड झालेल्या घरांचा सर्वे पूर्ण करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा सुचनाही कुटे यांनी दिल्या.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Sanjay Kuteसंजय कुटे