आधुनिक शेतीसाठी ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:21 IST2017-08-11T20:20:16+5:302017-08-11T20:21:47+5:30
हिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.

आधुनिक शेतीसाठी ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’
ओमप्रकाश देवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.
हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थींनींनी ग्रामपंचायत कार्यालयात इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे. याबाबत गुरूवारी हिवराआश्रम येथे शेतकºयांना माहिती देण्यात आली. यावेळी मुंगशीदेव डाखोरे, प्रा.विश्वनाथ गव्हाळे, विशाल घागरे, अजयअवसरमोल, दशरथ साबळे, अमोल अंभोरे, शरद तुपकरी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भारत हा देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातीत नागरीक शेती व शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतकºयांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे. शेतीच्या समृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतकºयाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते. देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे शेती व्यवसायात होत असलेल्या नवनवीन बदलांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामाची गुणवत्ता सुधारते. यामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार, ठिबक सिंचनाच्या सहाय्याने बागायती शेती करावी, अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी सृष्टी ग्रुपमध्ये शीतल फुपाटे, सोनम इंगळे, चैताली भालेराव, पुनम आव्हाड, पल्लवी काळे, मनिषा भोरकडे, विपश्यना इंगोले, प्रीती कदम, पूजा कुणबीथोप या विद्यार्थींनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेतकरी बांधवांना या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींनी केली आहे.
- डॉ. सुभाष कालवे, प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवराआश्रम.
इन्फॉर्मेशन कॉर्नरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल . या फलकावरील माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.
- मंजुषा क-हाडे, विद्यार्थीनी, विवेकानंद कृषी, महाविद्यालय.