शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:27 IST

जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सरसगट लाभ देण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. दरम्यान ३० जून पर्यंत अनुषंगीक माहिती ही पीएमकिसनच्या संकेतस्तळावर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रारंभीच्या पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० हजार ४७८ शेतकºयांना योजनेतंर्गत दुसरा हप्ता निर्गमीत करण्यात आला आहे.योजनेतंर्गत पात्र शेतकºयांचा संपूर्ण माहिती ही राष्ट्रीय स्तरावर संकलीत करण्यात येत असल्याने काही शेतकºयांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नसला तरी तो येत्या काळात त्यांना मिळेल, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत येणाºया अडचणी व तांत्रिक बाबींसंदर्भात १९ जून रोजी केंद्रीयस्तरावरून व्हीसीद्वारे जिल्हास्तरावरील यंत्रणेला प्रशिक्षण स्वरुपात माहिती देण्यात आली आहे. या व्हीसीला निवासी उपजिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्ती कक्षातील कर्मचारी व तत्सम अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, असे सुत्रांनी स्पष्ट केले.योजनेच्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्र्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर योजनेच्या निकषात काही बदल करण्यात येऊन सरसगट शेतकºयांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या जवळपास सव्वा लाख शेतकºयांनाही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी वगळता नव्या परिपत्रकानुसार ही मदत देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने तालुकास्तरावर सध्या पात्र शेतकºयांची यादी, त्यांचे आधारकार्ड, बँक खाते व तत्सम माहिती संकलीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.७० हजार शेतकºयांना दुसरा हप्तायोजनेतंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ४७८ शेतकºयांना १४ कोटी नऊ लाख ५६ हजार रुपयांचा हप्ता प्राप्त झाला आहे. यातील बहुतांश रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या हप्त्यात ७९ हजार ५८२ शेतकºयांना १५ कोटी ९१ लाख ६४ हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे. मधल्या काळात निवडणुक असल्याने योजनेच्या संदर्भाने असलेल्या कामात काहीशी शिथीलता निर्माण झाली होती. परंतू आता पुन्हा अनुषंगीक विषयाने वेग धरला आहे. जिल्ह्यात योजनेसाठी पात्र असलेले प्रारंभीचे शेतकरी हे एक लाख १७ हजार ६१७ होते. त्यात आता वाढ अपेक्षीत आहे.योजनेच्या अनुषंगाने माहिती संकलनाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ३० जून पर्यंत संकलीत केलेली अद्यावत माहिती संबंधित संकेतस्थळावर अलोड करावयाची आहे. योजनेतंर्गत संकलीत केलेला डाटा हा राष्ट्रीय स्तरावर राहणार असल्याने पात्र शेतकºयांना अनुषंगीक मदत मिळेल.- संतोष शिंदे, तहसिलदार, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी