शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उप-अभियानाबाबत उदासीनता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:50 IST

बुलडाणा : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी विभाग व वन विभाग या अभियानापासून अनभिज्ञता दाखवत असल्याने वन शेतीसाठी प्रशासकीय पातळीवरच उदासीनता दिसून येत आहे.  

ठळक मुद्देशेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्याचा उपक्रम वन, कृषी विभाग अनभिज्ञ

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी विभाग व वन विभाग या अभियानापासून अनभिज्ञता दाखवत असल्याने वन शेतीसाठी प्रशासकीय पातळीवरच उदासीनता दिसून येत आहे.  शेती उत्पादन व वृक्ष लागवड वाढविण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनाबरोबरच वृक्ष लागवड वाढविण्यावर भर देणारे वन शेती अभियान हाती घेण्यात आले आहे. वन शेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकर्‍यांना आलेल्या खर्चाच्या ५0 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्‍वत करण्यासह शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणार्‍या वन शेती अभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वन शेती अभियानाची कुठलीच अंमलबजावणी हाती घेण्यात आलेली नाही.  त्यामुळे हे अभियान कागदावरच राबविण्यात येते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. या अभियानासाठी कृषी विभागाची महत्त्वाची जबाबदारी असतानाही कृषी विभागाकडून यासाठी वन विभागाकडे बोट दाखविल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना महत्त्वाकांक्षी असलेल्या वन शेती अभियानापासून वंचित रहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

सॉइल हेल्थ कार्ड आवश्यकवन शेती  अभियानांतर्गत शेतीमध्ये कुठल्या प्रकारचे रोप लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते, यासाठी सॉईल हेल्थ कार्ड पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या अभियानाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे सॉईल हेल्थ कार्ड असणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास तातडीने कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांवर देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ३0 हजार सॉईल हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात अंमलबजावणीच नाही!केंद्र शासनाने वन शेती अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे. सदर अभियान सन २0१७-१८ साठी असतानाही अद्याप जिल्ह्यात कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी सुरू झाली नाही. यात वन विभाग व कृषी विभागाचा समन्वय महत्त्वाचा आहे; परंतु या दोन्ही विभागामध्ये  अभियानाविषयी निरुत्साह दिसून येत आहे. 

सॉईल हेल्थ कार्ड महत्त्वाचे असल्याने वन शेती अभियान हे कृषी विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान आहे. अंमलबजावणी व नियोजनामध्ये वन विभागाचा सहभाग राहणार आहे. - एस.एन.लांडे, वन अधिकारी, सामाजिक वनीकरण बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीforestजंगल