शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:31 IST

सणासुदीचे व शेती कामाचे दिवस पाहता नागरिकांची गैरसोय  तत्काळ थांबविण्यात यावी व कोणत्याही ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा  शासनाविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात  येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे  यांनी  मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे  दिला आहे.

ठळक मुद्देआमदार राहुल बोंद्रे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा विद्युत  पुरवठा खंडित करण्याचा प्रकार विद्युत विभागाने सुरू केला  आहे. त्यामुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना  कोलमडून पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी  भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली आहे; तसेच  सणासुदीचे व शेती कामाचे दिवस पाहता नागरिकांची गैरसोय  तत्काळ थांबविण्यात यावी व कोणत्याही ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा  शासनाविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात  येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे  यांनी  मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे  दिला आहे.राज्यात मागणीपेक्षा विद्युत निर्मिती जास्त असताना तथाक थीत कोळसा पुरवठय़ाचे कारण समोर करीत विद्युत वितरण  कंपनीने आचानकपणे सणासुदीच्या दिवसातील  न्1ागरिकांची विजेची गरज लक्षात न घेता, मोठय़ा प्रमाणावर  भारनियमन लादण्याचा प्रकार सुरू केला आहे. वस्तुत:  सणासुदीच्या दिवसात, उत्सवाचे काळात ग्रामीण तसेच  अर्धशहरी नागरिकांची विजेची मागणी वाढलेली असते. त्याशिवाय येणारा रब्बी हंगाम पाहता शेतकर्‍यांनाही अखंडि त विद्युत पुरवठय़ाची गरज आहे. असे असताना विद्युत वि तरण कंपनी भारनियमन करून जनतेला त्रास देण्याचा प्रकार  करीत आहे.  तो तत्काळ बंद व्हावा, याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा  योजनांची कुठलीही पूर्वसूचना न देता तोडल्या जाणारी वीज  हा प्रकार थांबवून जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय करू  नये, अशी आग्रही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी मु ख्यमंत्री व उर्जामंत्री यांना पाठविलेल्या या निवेदनाद्वारे केली  आहे.