शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:33 IST

चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.चिखली तालुक्यातील गोदरी येथे काल ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते, यावेळी रविकांत तुपकर यांच्या हस्ते गोदरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन झाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांचे गोदरी गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गावकर्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, शासनाने सुरुवातीला सोयाबीनचे भाव पाडल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावाने आपले सोयाबीन विकावे लागले. दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील कपाशीवर बोंडअळी पडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, सरकारने या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. मात्न हे सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे टाकत नाही, तोपर्यंत ‘‘सरकारचे हे लबाडाचे आवतन’’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच नाफेड योजना शेतकर्‍यांसाठी नसून भाजपच्या दलालांसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतीमालाला हमीभाव व उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची घोषणा केली; मात्न सरकारने आधी दीडपट हमी भाव व उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले; तसेच गोदरी येथील गावकर्‍यांनी माझ्यावर व माझ्या चळवळीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे.     यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, भगवानराव मोरे, बबनराव चेके, राणा चंदण, संजय इंगळे, सतीश मोरे, मयूर बोर्डे, अजीम, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, गणेश शिंगणे, गोदरीच्या सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्यु कर्‍हाडे, भागवत म्हस्के, राम अंभोरे, साजीद, संतोष परिहार, राजू मोरे, सरदारसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत, छोटु झगरे, रामेश्‍वर परिहार, अमोल मोरे, नवृत्ती शेवाळे, प्रवीण राऊत, डॉ.जंजाळ, राहुल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना