शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: "मी मन की बात सांगायला आलो नाही, तुमचा आवाज ऐकायला आलोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:25 IST

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे

शेगाव - काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती. त्यानंतर, राहुल गांधींनी शेगावमधून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधत भाजपकडून देशात द्वेष पसरवण्यात येत असून हिंसेचं राजकारण करण्यात येत असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू , फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असून कोणीही द्वेष पसरवण्याचं सांगितलं नाही. मात्र, विरोधकांकडून द्वेष पसरवण्यात येत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. 

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे. या प्रवासात अनेक राज्यातून येत मी महाराष्ट्रात पोहोचलो आहे. तिरस्काराने कधीही या देशाला फायदा झाला नाही, प्रेमानेच देश पुढे जातो. कुटुंबात द्वेष पसरवल्यानंतर कुटुंबाचं भलं होत नाही. मग, देशात द्वेषाचं राजकारण केल्यानंतर देशाला फायदा होईल का? असे म्हणत राहुल गांधींनी उपस्थित जनसमुदायालाच सवाल केला. 

विरोधक म्हणतात यात्रेची गरजच काय, पण भाजपने द्वेषाचं राजकारण केलं असून आम्ही प्रेमाचं राजकारण समजावून द्यायला ही यात्रा सुरू केल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. या यात्रेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी संवाद साधतोय. पण, मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलोय. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. मी यात्रेत फिरत असताना जिथे जाईल तिथे मला एकच प्रश्न सातत्याने ऐकायला मिळतोय. आमच्या मालाला भाव मिळत नाही, असे प्रत्येक शेतकरी सांगतोय. काही हजारांच्या कर्जासाठी आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, पण देशात बड्या उद्योगपतीचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ होतंय, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

बाळापूर ते वरखेड पायी प्रवास

खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी शेगाव येथे आगमन झाले. बाळापूर ते वरखेड फाट्यापर्यन्त पायी प्रवास केल्यानंतर खा. गांधी यांनी वरखेड फाट्यावर काही वेळ विश्राम केला. त्यानंतर खा. राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते वाहनाने दुपारी विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज मंदिरात  पोहोचले. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानकडून व्यवस्थापकीय विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी खा. गांधी यांचा यथोचित सत्कार केला. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांची जाहीर सभेच्या ठिकाणी रवाना झाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcongressकाँग्रेसBJPभाजपा