शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

Rahul Gandhi: "मी मन की बात सांगायला आलो नाही, तुमचा आवाज ऐकायला आलोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:25 IST

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे

शेगाव - काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती. त्यानंतर, राहुल गांधींनी शेगावमधून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधत भाजपकडून देशात द्वेष पसरवण्यात येत असून हिंसेचं राजकारण करण्यात येत असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू , फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असून कोणीही द्वेष पसरवण्याचं सांगितलं नाही. मात्र, विरोधकांकडून द्वेष पसरवण्यात येत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. 

७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे. या प्रवासात अनेक राज्यातून येत मी महाराष्ट्रात पोहोचलो आहे. तिरस्काराने कधीही या देशाला फायदा झाला नाही, प्रेमानेच देश पुढे जातो. कुटुंबात द्वेष पसरवल्यानंतर कुटुंबाचं भलं होत नाही. मग, देशात द्वेषाचं राजकारण केल्यानंतर देशाला फायदा होईल का? असे म्हणत राहुल गांधींनी उपस्थित जनसमुदायालाच सवाल केला. 

विरोधक म्हणतात यात्रेची गरजच काय, पण भाजपने द्वेषाचं राजकारण केलं असून आम्ही प्रेमाचं राजकारण समजावून द्यायला ही यात्रा सुरू केल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. या यात्रेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी संवाद साधतोय. पण, मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलोय. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. मी यात्रेत फिरत असताना जिथे जाईल तिथे मला एकच प्रश्न सातत्याने ऐकायला मिळतोय. आमच्या मालाला भाव मिळत नाही, असे प्रत्येक शेतकरी सांगतोय. काही हजारांच्या कर्जासाठी आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, पण देशात बड्या उद्योगपतीचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ होतंय, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

बाळापूर ते वरखेड पायी प्रवास

खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी शेगाव येथे आगमन झाले. बाळापूर ते वरखेड फाट्यापर्यन्त पायी प्रवास केल्यानंतर खा. गांधी यांनी वरखेड फाट्यावर काही वेळ विश्राम केला. त्यानंतर खा. राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते वाहनाने दुपारी विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज मंदिरात  पोहोचले. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानकडून व्यवस्थापकीय विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी खा. गांधी यांचा यथोचित सत्कार केला. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांची जाहीर सभेच्या ठिकाणी रवाना झाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcongressकाँग्रेसBJPभाजपा