शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

सौर कृषी पंपावर बागायती शेती

By admin | Updated: May 20, 2017 00:18 IST

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत. या सौर कृषी पंपाद्वारे १२ तास शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी द्यावे लागत नाही. हा त्रासही सौर कृषी पंपामुळे कायमचा बंद झाला आहे.राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडत असून, हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्ती ठरावीक प्रमाणातच उपलब्ध आहे. पर्यावरणास पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने अपारंपरिक उर्जा स्रोताचा विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहनात्मक धोरण वेळोवेळी जाहीर केले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत, निरंतर स्वरूपाचा व महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी महावितरणची विद्युत वाहिनी अद्यापपर्यंत पोहचलेली नाही किंवा ज्या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे विद्युत पुरवठा करणे शक्य होत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर क्षेत्रापर्यंत शेती आहे. अशा शेतकऱ्यांकरिता ही अटल सौर कृषी पंप योजना आहे. तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या शेतात सद्यस्थितीत या सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती हे शेतकरी करीत आहेत. सौर कृषी पंपाच्या युनिटद्वारे दिवसा १२ तास हे कृषी पंप शेतात चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभर आपल्या बागायती शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत आहे. महावितरणची लाइट असो वा नसो, मात्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसविल्यामुळे आता सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती करीत आहेत. महावितरण कंपनीकडून कृषी पंपांना होणारा विद्युत पुरवठा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेळोवेळी खंडित केला जात होता. त्यामुळे बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून व वन्य प्राण्यांपासून बचाव करीत पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र, सौर कृषी पंप बसविल्यामुळे तालुक्यातील १८ शेतकऱ्यांचा हा त्रास आता कायमचाच बंद झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये फक्त पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून हे सौर कृषी पंप आपल्या शेतात बसविले आहेत. याकरिता ३ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता १६ हजार २०० रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरणा करून हा सौर कृषी पंप, तर ५ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता २७ हजार रुपयांचा भरणा, तर साडेसात अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता ३६ हजार रुपयांचा ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे सौर कृषी पंप बसविले आहेत. या शेतकऱ्यांची कृषी पंपाद्वारे सुरू आहे बागायती शेती!तालुक्यातील गजानन रामभाऊ वानखडे आकोली, ज्योती संदीप धामोळे सोनाळा, दिनेश नंदकुमार बंदरकर टुनकी, सुरेखा मंगेश भोंडे एकलारा, तुळशीराम मुकुंदा बंदरकार टुनकी, नारायण रतनलाल चांडक, वानखेड, अमोल अरुण वानखडे पळशी, गोपाल काशिनाथ गाडगे उमरा, श्रीकृष्णा तुळशिराम सारिशे पेसोडा, धुमसिंग वालसिंग टुडवा वसाडी, ज्योती अशोक टावरी काथरगाव, केसरबाई गंगाराम मसण्या करमोडा, मदनसिंग माली, हदयामहल, गयाबाई रामदास कोठे सोनाळा, आनंदा शंकर वानखडे हिंगणा, संदीप बाबनराव धामोळे, कुठरसिंग जाधव सालवण या अठरा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवून बागायती शेती केली आहे.शेतात कृषी पंप बसविल्यामुळे भारनियमनाचे आता टेन्शन नाही. तसेच १२ तास सौर कृषी पंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे आता उत्पादनातही वाढ झाली आहे.- वैभव गजानन वानखडे, शेतकरी आकोली