शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सौर कृषी पंपावर बागायती शेती

By admin | Updated: May 20, 2017 00:18 IST

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत. या सौर कृषी पंपाद्वारे १२ तास शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी द्यावे लागत नाही. हा त्रासही सौर कृषी पंपामुळे कायमचा बंद झाला आहे.राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडत असून, हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्ती ठरावीक प्रमाणातच उपलब्ध आहे. पर्यावरणास पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने अपारंपरिक उर्जा स्रोताचा विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहनात्मक धोरण वेळोवेळी जाहीर केले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत, निरंतर स्वरूपाचा व महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी महावितरणची विद्युत वाहिनी अद्यापपर्यंत पोहचलेली नाही किंवा ज्या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे विद्युत पुरवठा करणे शक्य होत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर क्षेत्रापर्यंत शेती आहे. अशा शेतकऱ्यांकरिता ही अटल सौर कृषी पंप योजना आहे. तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या शेतात सद्यस्थितीत या सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती हे शेतकरी करीत आहेत. सौर कृषी पंपाच्या युनिटद्वारे दिवसा १२ तास हे कृषी पंप शेतात चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभर आपल्या बागायती शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत आहे. महावितरणची लाइट असो वा नसो, मात्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसविल्यामुळे आता सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती करीत आहेत. महावितरण कंपनीकडून कृषी पंपांना होणारा विद्युत पुरवठा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेळोवेळी खंडित केला जात होता. त्यामुळे बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून व वन्य प्राण्यांपासून बचाव करीत पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र, सौर कृषी पंप बसविल्यामुळे तालुक्यातील १८ शेतकऱ्यांचा हा त्रास आता कायमचाच बंद झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये फक्त पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून हे सौर कृषी पंप आपल्या शेतात बसविले आहेत. याकरिता ३ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता १६ हजार २०० रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरणा करून हा सौर कृषी पंप, तर ५ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता २७ हजार रुपयांचा भरणा, तर साडेसात अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता ३६ हजार रुपयांचा ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे सौर कृषी पंप बसविले आहेत. या शेतकऱ्यांची कृषी पंपाद्वारे सुरू आहे बागायती शेती!तालुक्यातील गजानन रामभाऊ वानखडे आकोली, ज्योती संदीप धामोळे सोनाळा, दिनेश नंदकुमार बंदरकर टुनकी, सुरेखा मंगेश भोंडे एकलारा, तुळशीराम मुकुंदा बंदरकार टुनकी, नारायण रतनलाल चांडक, वानखेड, अमोल अरुण वानखडे पळशी, गोपाल काशिनाथ गाडगे उमरा, श्रीकृष्णा तुळशिराम सारिशे पेसोडा, धुमसिंग वालसिंग टुडवा वसाडी, ज्योती अशोक टावरी काथरगाव, केसरबाई गंगाराम मसण्या करमोडा, मदनसिंग माली, हदयामहल, गयाबाई रामदास कोठे सोनाळा, आनंदा शंकर वानखडे हिंगणा, संदीप बाबनराव धामोळे, कुठरसिंग जाधव सालवण या अठरा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवून बागायती शेती केली आहे.शेतात कृषी पंप बसविल्यामुळे भारनियमनाचे आता टेन्शन नाही. तसेच १२ तास सौर कृषी पंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे आता उत्पादनातही वाढ झाली आहे.- वैभव गजानन वानखडे, शेतकरी आकोली