शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

बुलडाणा जिल्ह्यात दीड महिन्यात १७ जणांना उष्माघाताचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:18 IST

बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ११ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने दाखल केले होते. सहा वर्षाच्या मुलापासून ते ६५ वर्षाच्या वृद्धापर्यंतचा यामध्ये समावेश आहे. दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताच फटका बसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. सुदैवाने यातील सर्वजण सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे.प्रामुख्याने या १७ जणामध्ये घाटाखालील विशेषत: शेगाव तालुक्याच्या परिसरातील नागरिकांची संख्या अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी पाहता स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालायत आतापर्यंत पाच जणांना तर खामगाव येथील रुग्णालयात एकाला आणि शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ११ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने दाखल केले होते. सहा वर्षाच्या मुलापासून ते ६५ वर्षाच्या वृद्धापर्यंतचा यामध्ये समावेश आहे. दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताच फटका बसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या कपील एकनाथ हिवाळे (२०), नीलेश एकनाथ मिसाळ (२३), गायत्री कडूबा अव्हाड (६), शेख शकील शेख सलीम (६) आणि रमेश सीताराम पवार (४०) यांना सुटी देण्यात आली आहे. खामगाव येथेही दाखल करण्यात आलेल्या शत्रूघ्न इंगळे यासही सुटी देण्यात आली आहे. शिरपूर, नांद्राकोळी, धाड, धावडा आणि बुलडाण्यातील मिलींदनगरमधील या व्यक्ती रहिवाशी आहे.

शेगाव रुग्णालयात संख्या अधिकउष्माघाताच्या उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या शेगाव रुग्णालयातील आहे. माहदेव सुखदेव वाकेकर (मलकापूर), रामदास श्रीराम आव्हाड (चांगेफळ, जळगाव जामोद), बालू भावराव वानखेडे (शेगाव), रमाबाई भघवान म्हस्के (चांगवा, संग्रामपूर), शालिग्राम तुळशीराम उमरावाटे (सगड, अकोला), बाळकृष्ण  रामकृष्ण गवई (शेगाव), बाबाराव वामन इंगळ (चिंचोली, शेगाव), सुनील ग्यानसींग खानंन्दे (मुक्ताईनगर, जळगाव खान्देश), संजय किसन पवार (शेगाव), अंबादास विठोबा सुरूशे (गोलखेड, शेगाव), सुनील श्यामराव नानंदे (शेगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, उष्माघाताचा फटका बसलेल्या या सर्व व्यक्तींना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHeat Strokeउष्माघातShegaonशेगाव