शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना

By निलेश जोशी | Updated: October 8, 2022 17:03 IST

नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते.

बुलढाणा : नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील आजी व नातीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोणार तालुक्यातील बिबी येथून ७ ऑक्टोबरला रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर ही महिला तीन वर्षाच्या कल्याणीसह लक्ष्मीबाईच्या मुलीची मुलगी पायल शिंदे (७) आणि कल्याणीचा पाच वर्षाचा भाऊ चेतन मुधोळकर यांच्यासह बसली होती. दरम्यान यातील चेतन आणि पायल हे या अपघातामध्ये जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात येत आहेत.

हे कुटुंब बिबी परिसरात गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याने राहाण्यासाठी आले होते. मोलमजुरी करून ते उपजिविका करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सद्वारे ते मुंबईला कामासाठी जात असावे, असा कयास आहे. ते नेमके कोठे जात होते याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकली नाही. लक्ष्मीबाई मुधोळकर समवेत तिची तीन वर्षाची नात कल्याणी आकाश मुधोळकर, पायल शिंदे (७) आणि चेतन मुधोळकर हेही जात होते.

खासगी वाहनाद्वारे नातेवाईक नाशिकला -नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते. दरम्यान या दोघींचीही अेाळख महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पटविण्यात आली होती. सोबतच दोघींच्या मृत्यूची माहिती बिबी येथील पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी मृतकांच्या नातेवाईकाना दिली.

ट्रॅव्हल्स एजंटचा अजब तर्क -बिबी येथून काही जण चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये कदाचीत बसेल असावेत त्याची आपणास कल्पना. ज्या व्यक्ती बसल्या त्या पनवेल मार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सद्वारे गेल्याचे बिबी येथील ट्रॅव्हल्स एजंट बापू देशमुख यांनी सांगितले. सोबतच रात्री जोरदार पाऊस असल्याने नेमके बसद्वारे कोण गेले हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. सोबतच आपल्याकडून बुकींग झालेली नव्हती असेही देशमुख म्हणाले. त्यामुळे या ट्रॅव्हलसाठीचे बिबी येथील या मृत व जखमी व्यक्तींचे तिकीटाचे बुकिंग कोणी केले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते या कयासास पुष्टी मिळत आहे. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही त्यानुषंगानेच प्रसारमाध्यमांशी बोलतांना संकेत दिले होते. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू