शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हर्च विकासाचे मंदिर - भास्कर पेरे पाटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि शुकदास महाराज या शेवटच्या घटकाला सुखी करण्यासाठीच झटले. त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत हीच मंदिर अशी धारणा ठेवून विकासासाठी झटावे, असे प्रतिसादन आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे भास्कर पेरे पाटील यांनी येथे केले.

स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात बुधवारी ग्रामविकास या विषयावरील व्याखानात ते बोलत होते. सरपंच हा गावाचा खरा मालक असतो. त्यामुळे त्याने अतिशय जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. शाश्वत गाव विकासाची संकल्पना रुजविण्यासाठी मतदारांनीही सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र, अलिकडच्या काळात लोकशाही मूल्य पायदळी तुडविल्या जाताहेत. पैसे घेऊन मतदान करणारा मतदार हा स्वत:च्या गावाच्या विकासात अडथळा निर्माण करीत असतो. तसे निवडून आलेले पुढारी पैसे खर्च केल्यामुळे तेवढे पैसे काढण्याच्या प्रयत्नात गावचा विकास विसरून जातात. अत्यंत साध्यासाध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्यावर महाराज वापरत असलेले शौचालय आजही बघायला मिळते. याचा अर्थ त्यांनी घाणीतून रोगराई निर्माण होऊ शकते. त्यांने रयतेचे आरोग्य खराब होऊ शकते हा विचार त्याकाळात केला होता. गावाला स्वच्छ पाणी,स्वच्छ परिसर,प्राथमिक शिक्षण व आरोग्य विषयक सुविधा पुरविणे हे प्रत्येक ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला दिवसाला पाच लिटर पाणी लागते. मात्र तेच पाणी स्वच्छ व निर्मळ नसेल तर आपले आरोग्य बिघडते. भांडी घासताना,धुणे धुतांना जे सांडपाणी विनाकारण वाहून जाते तेच पाणी शौच खड्डा करून त्यामध्ये ते सांडपाणी मुरल्यास जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. म्हणून प्रत्येकाने सांडपाण्याचे नियोजन करावे जेणे करून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नवजात बालक जन्माला आल्यानंतर प्रथम त्याला ऑक्सिजची गरज असते त्यानंतर मातेच्या दुधाची असते. त्यामुळे झाडे लावा,झाडे जगवा हा आधुनिक काळातील मंत्र आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकार करावा. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी झाडे लावावे. रक्षाविसर्जन प्रसंगी पाण्यात रक्षा विसर्जनाची पध्दतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. असल्याचे ते म्हणाले.