शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हर्च विकासाचे मंदिर - भास्कर पेरे पाटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि शुकदास महाराज या शेवटच्या घटकाला सुखी करण्यासाठीच झटले. त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत हीच मंदिर अशी धारणा ठेवून विकासासाठी झटावे, असे प्रतिसादन आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे भास्कर पेरे पाटील यांनी येथे केले.

स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात बुधवारी ग्रामविकास या विषयावरील व्याखानात ते बोलत होते. सरपंच हा गावाचा खरा मालक असतो. त्यामुळे त्याने अतिशय जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. शाश्वत गाव विकासाची संकल्पना रुजविण्यासाठी मतदारांनीही सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र, अलिकडच्या काळात लोकशाही मूल्य पायदळी तुडविल्या जाताहेत. पैसे घेऊन मतदान करणारा मतदार हा स्वत:च्या गावाच्या विकासात अडथळा निर्माण करीत असतो. तसे निवडून आलेले पुढारी पैसे खर्च केल्यामुळे तेवढे पैसे काढण्याच्या प्रयत्नात गावचा विकास विसरून जातात. अत्यंत साध्यासाध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्यावर महाराज वापरत असलेले शौचालय आजही बघायला मिळते. याचा अर्थ त्यांनी घाणीतून रोगराई निर्माण होऊ शकते. त्यांने रयतेचे आरोग्य खराब होऊ शकते हा विचार त्याकाळात केला होता. गावाला स्वच्छ पाणी,स्वच्छ परिसर,प्राथमिक शिक्षण व आरोग्य विषयक सुविधा पुरविणे हे प्रत्येक ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला दिवसाला पाच लिटर पाणी लागते. मात्र तेच पाणी स्वच्छ व निर्मळ नसेल तर आपले आरोग्य बिघडते. भांडी घासताना,धुणे धुतांना जे सांडपाणी विनाकारण वाहून जाते तेच पाणी शौच खड्डा करून त्यामध्ये ते सांडपाणी मुरल्यास जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. म्हणून प्रत्येकाने सांडपाण्याचे नियोजन करावे जेणे करून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नवजात बालक जन्माला आल्यानंतर प्रथम त्याला ऑक्सिजची गरज असते त्यानंतर मातेच्या दुधाची असते. त्यामुळे झाडे लावा,झाडे जगवा हा आधुनिक काळातील मंत्र आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकार करावा. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी झाडे लावावे. रक्षाविसर्जन प्रसंगी पाण्यात रक्षा विसर्जनाची पध्दतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. असल्याचे ते म्हणाले.