शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

ग्रामपंचायत हर्च विकासाचे मंदिर - भास्कर पेरे पाटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिवरा आश्रम: ग्रामीण भागातील शेवटचा घटक सुखी करण्याची महापुरुषांची धारणा होती. कर्मयोगी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि शुकदास महाराज या शेवटच्या घटकाला सुखी करण्यासाठीच झटले. त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत हीच मंदिर अशी धारणा ठेवून विकासासाठी झटावे, असे प्रतिसादन आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे भास्कर पेरे पाटील यांनी येथे केले.

स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात बुधवारी ग्रामविकास या विषयावरील व्याखानात ते बोलत होते. सरपंच हा गावाचा खरा मालक असतो. त्यामुळे त्याने अतिशय जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. शाश्वत गाव विकासाची संकल्पना रुजविण्यासाठी मतदारांनीही सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र, अलिकडच्या काळात लोकशाही मूल्य पायदळी तुडविल्या जाताहेत. पैसे घेऊन मतदान करणारा मतदार हा स्वत:च्या गावाच्या विकासात अडथळा निर्माण करीत असतो. तसे निवडून आलेले पुढारी पैसे खर्च केल्यामुळे तेवढे पैसे काढण्याच्या प्रयत्नात गावचा विकास विसरून जातात. अत्यंत साध्यासाध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्यावर महाराज वापरत असलेले शौचालय आजही बघायला मिळते. याचा अर्थ त्यांनी घाणीतून रोगराई निर्माण होऊ शकते. त्यांने रयतेचे आरोग्य खराब होऊ शकते हा विचार त्याकाळात केला होता. गावाला स्वच्छ पाणी,स्वच्छ परिसर,प्राथमिक शिक्षण व आरोग्य विषयक सुविधा पुरविणे हे प्रत्येक ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला दिवसाला पाच लिटर पाणी लागते. मात्र तेच पाणी स्वच्छ व निर्मळ नसेल तर आपले आरोग्य बिघडते. भांडी घासताना,धुणे धुतांना जे सांडपाणी विनाकारण वाहून जाते तेच पाणी शौच खड्डा करून त्यामध्ये ते सांडपाणी मुरल्यास जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. म्हणून प्रत्येकाने सांडपाण्याचे नियोजन करावे जेणे करून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नवजात बालक जन्माला आल्यानंतर प्रथम त्याला ऑक्सिजची गरज असते त्यानंतर मातेच्या दुधाची असते. त्यामुळे झाडे लावा,झाडे जगवा हा आधुनिक काळातील मंत्र आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकार करावा. आपण आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी झाडे लावावे. रक्षाविसर्जन प्रसंगी पाण्यात रक्षा विसर्जनाची पध्दतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. असल्याचे ते म्हणाले.