शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:48 IST

खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर काढण्यात येत असलेली जनसंघर्ष यात्रा  खामगावात ८ डिसेंबररोजी संध्याकाळी ७ वाजता पोहचली. यानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत जाहिर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे  सहप्रभारी तथा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,  प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर,  बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड,  जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे,  खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, विजय अंभोरे, आमदार यशोमती ठाकूर, खामगाव माजी नगराध्यक्ष अशोक सानंदा, साजीदखान पठाण, बाळापूरचे माजी आमदार खतीब, औरंगाबादचे आमदार सत्तार, अतूल लोंढे, आशिष जैन यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना विखे पाटील यांनी जिल्हयासह राज्यातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. शेतकरी, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना सरकारला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकºयाने कांद्याची मनीआॅर्डर पाठवूनही दु:ख कळले नाही. उलट त्यांनी शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे याची चौकशी सुरु केली. सरकारने आता देवांनाही सोडले नाही अशीही टिका त्यांनी केली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनतेचे सज्ज राहावे. २०१९ च्या निवडणूकीत भाजपाला जागा दाखवण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले. तत्पूर्वी नाना पटोले, आमदार सत्तार, आशिष जैन, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ  यांनीही भाषणातून भाजपाचा विविध उदाहरणे देत समाचार घेतला. आभार प्रदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील