शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:48 IST

खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर काढण्यात येत असलेली जनसंघर्ष यात्रा  खामगावात ८ डिसेंबररोजी संध्याकाळी ७ वाजता पोहचली. यानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत जाहिर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे  सहप्रभारी तथा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,  प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर,  बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड,  जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे,  खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, विजय अंभोरे, आमदार यशोमती ठाकूर, खामगाव माजी नगराध्यक्ष अशोक सानंदा, साजीदखान पठाण, बाळापूरचे माजी आमदार खतीब, औरंगाबादचे आमदार सत्तार, अतूल लोंढे, आशिष जैन यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना विखे पाटील यांनी जिल्हयासह राज्यातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. शेतकरी, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना सरकारला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकºयाने कांद्याची मनीआॅर्डर पाठवूनही दु:ख कळले नाही. उलट त्यांनी शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे याची चौकशी सुरु केली. सरकारने आता देवांनाही सोडले नाही अशीही टिका त्यांनी केली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनतेचे सज्ज राहावे. २०१९ च्या निवडणूकीत भाजपाला जागा दाखवण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले. तत्पूर्वी नाना पटोले, आमदार सत्तार, आशिष जैन, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ  यांनीही भाषणातून भाजपाचा विविध उदाहरणे देत समाचार घेतला. आभार प्रदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील