शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:56 PM

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमध्ये झाले प्रत्यक्ष मतदानसीमा पंचाळ कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरूपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सीमा संजय पंचाळ यांना मिळू नये, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करून १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहीमखा शेरखा पठाण, गीताबाई संतोष गवई, गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अविश्‍वास दाखल करण्याकरिता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहुमताने ठराव पारित होऊ शकतो, सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित करण्यासाठी सातपैकी पाच सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. परंतु चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध करण्यात आलेला अविश्‍वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये दिला. अविश्‍वास ठराव बारगळल्यामुळे गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ कायम आहेत. अविश्‍वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत