शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

‘देवा, आता तरी शाळा उघडतील का...?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

शिक्षण क्षेत्रामध्येही कोरोनाने होत्याचे नव्हते केले आहे. अगदी केजी वन पासून ते पीजीपर्यंतचे सर्वच शिक्षण ऑनलाइन झाले आहे. बारावीच्या ...

शिक्षण क्षेत्रामध्येही कोरोनाने होत्याचे नव्हते केले आहे. अगदी केजी वन पासून ते पीजीपर्यंतचे सर्वच शिक्षण ऑनलाइन झाले आहे. बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात झाली. परीक्षेच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे परीक्षांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला. दहावीचा एका विषयाचा पेपरही रद्द करण्याची वेळ या वर्षात आली. ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंद करावे लागले. शिक्षण विभागात पहिल्यांदाच मोठा बदल पाहावयास मिळाला. त्यानंतर सर्व शिक्षण ऑनलाइनवर सुरू झाले.

खासगी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक तसेच व्यवस्थापनासमोर मोठी अडचण निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांचे मागील वर्षीचे शुल्क प्रलंबित राहिले व नव्या वर्षांचे शुल्क भरता आले नाही. शासनातर्फे देखील आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळाली नाही. खासगी शाळांनी शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्याने पालकांची चिंता वाढली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी शुल्क वसुलीमध्ये सवलत देण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी बऱ्याच संस्थांमधून झाली नाही. नीट परीक्षा घेण्याबाबतही बराचसा गोंधळ शिक्षण विभागात पाहावयास मिळाला.

पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे पुढल्या वर्गात प्रवेश दिला. दहावी ते बारावीच्या उत्तर पत्रिका तपासून शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. विशेषत: वार्षिक मूल्यांकन आणि ऑनलाईन परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरही भरघोस गुण दिसून आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कामकाज कोरोना संसर्गामुळे १३ मार्च २०२० पासून बंद झाले. कोरोनाचे संकट आले आणि विद्यापीठाचा कारभार बंद झाला. त्यामुळे परीक्षा कधी, कशा घ्याव्यात, हा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला होता. अंतिम वर्षाची परीक्षा आणि निकाल या गोंधळातच विद्यार्थ्यांचे वर्ष सरले. प्राथमिक व खासगी शाळांमध्येही परीक्षांच्या बाबतीत गोंधळच उडाला. २०२० हे वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच राहिले. सरत्या वर्षांत कोरोनाने केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, प्राध्यापक, शाळा-महाविद्यालय व्यवस्थापन व पालकांची देखील परीक्षाच पाहिली. कुणाला वेतन नाही, तर कुणाकडे स्मार्टफोन नव्हता. मात्र शिक्षणक्षेत्राने यातूनही बऱ्याच सकारात्मक बाबी शोधून काढल्या, त्यामुळे २०२० या वर्षात बरेच काही गमावले असले तरी नवीन खूप काही शिकविले आहे.

दृष्टिक्षेपात शिक्षण विभागातील घडामोडी

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात अपयश आल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली.

ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विनाअनुदानित खासगी शाळांवरील अनेक शिक्षकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच झाले वर्गखोली.

शाळा सोडून शिक्षकांच्या ड्यूट्या चेकपोस्टवर लागल्या.

बोर्डाच्या निकालावर परिणाम झाला.