शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पैसा, बंगला, गाडी द्या अन्‌ नवऱ्याला जणू विकतच घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST

बुलडाणा : समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा ...

बुलडाणा : समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्यांची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे.

हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे.

लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत. जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २०२० मध्ये ८५ गुन्हे दाखल झाले आहेत़, तसेच २०२१ च्या जूनपर्यंत २८ गुन्हे दाखल झाले आहेत़

पैशांच्या मागणीऐवजी आता साेने व इतर वस्तू मागण्यात येत आहेत़. मुलगा नाेकरीवर असल्यास त्याचे भावही जास्त आहेत़. त्यातही प्राध्यापक, डाॅक्टरही हुंडा घेण्यात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हुंडा मिळाला नाही किंवा मनासारख्या वस्तू मिळाल्या नाहीत, तर विवाहितांचा छळ करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

हुंडा म्हणायचा की पाेराचा लिलाव

हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लॉट, दागिने मागितले जातात.

लग्नात लागणारा खर्चही मुलींच्या वडिलांकडूनच घेणारे काही महाभाग समाजात आहेत़

सरकारी नाेकरीवर असलेली मुले सर्वाधिक हुंडा घेत असल्याचे चित्र आहे़. अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत

मुलाला नोकरीसाठी लागणारे डोनेशन मुलीच्या वडिलांनी द्यावे, व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांनी द्यावा, बहुतांश कुटुंब माैल्यवान वस्तूंच्या रूपात हुंडा घेतात. आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. अशिक्षितांपेक्षा शिक्षित लोक जास्त हुंडा मागताना दिसतात. हुंडा मागण्याचे स्वरूप बदलले आहे. लग्नात होणारा स्वर्च, डिजेचा खर्च, वरातीला लागणाऱ्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्याच वडिलांनी करून मुलाचे भविष्य घडवण्यासाठी हातभार लावावा, असे सांगितले जाते.

मुलीचे आई-वडीलही जबाबदार

समाजात हुंडा देणारे आहेत म्हणून मागणारेही आहेत़. नाेकरीवर असलेला जावई मिळावा, यासाठी मुलीचे आई-वडील कितीही हुंडा द्यायला तयार असतात़. त्यामुळे, हुंडा पद्धती समाजात टिकवून ठेवायला मुलीचे आई-वडीलही जबाबदार असल्याचे चित्र आहे. हुंडा मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिल्यास समाजातून हुंडा पद्धत बंद हाेण्यास मदत मिळणार आहे़

नवीन पिढी बदलतेय़

सध्याची युवा पिढी परिवर्तन करीत असल्याचे काहीसे दिलासादायक चित्र आहे. अनेक युवक पसंतीला महत्त्व देत आहेत़. हुंडा हा गाैण ठरत असल्याचे चित्र आहे; मात्र ही संख्या अजूनही फार कमी आहे. घरातील ज्येष्ठ लाेकच लग्न जुळवतात़. त्यात हुंड्याची मागणी माेठ्या प्रमाणात हाेते. युवकांनी हुंडा न घेण्याची शपथ घेतल्यास ही पद्धत समाजातून हद्दपार हाेणार आहे. अनेक मुलींच्या पालकांना आर्थिक कुवत नसतानाही माेठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागताे़, त्यासाठी कर्ज काढावे लागते. त्यामुळे ही हुंडा पद्धत बंद करण्याची गरज आहे.