शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:02 IST

सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला.

 

बुलडाणा: मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने विदर्भाला झुकतेमाप राहील अशी सर्व सामान्यांची अपेक्षा होती. मात्र विदर्भातच पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव मुख्यमंत्र्यांकडून शेतीसाठीच्या वीज धोरणावरून होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. शेतीसाठी वीजेच्या भारनियमनाचे धोरण ठरवितांना पश्चिम व पूर्व विदर्भ असा भेदभाव शासनाने केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यांवर या धोरणामुळे अन्याय झाल्याची भावना आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांना शेतीसाठी १२ तास तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय २० आॅगस्ट २०१८ रोजी एमईआरसी २३९/२१८ क्रमांकाचे परित्रक पारीत करून शासनाने घेतला. त्यातच पश्चिम विदर्भाला दिली जाणारी आठ तासांची वीजही प्रत्यक्षात पाच तासच ती मिळते. मुख्यमंत्री व ऊजार्मंत्री हे विदर्भातीलच असतानाही हा प्रांतिक भेद शेतकर्यांसाठी अन्यायकारक आहे. ज्या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची संख्या जास्त आहे, तेथील शेतकर्यांचा संकटात लोटण्याचा हा प्रकार असल्याचे निवेदनात त्यांनी नमूद केले. पूर्व व पश्चिम विदर्भ असा भेद नकरता पश्चिम विदर्भातही शेतीसाठी १२ तास वीज देण्याचे नियोजन व्हावे, अशी आ. बोंद्रेंची मागणी आहे. वीज रोहीत्र दुरुस्तीची समस्या बुलडाणा जिल्ह्यात वीज रोहित्र जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. नादुरुस्त वीज रोहित्र दीड-दीड महिना होऊनही दुरुस्त केले जात नाही. मुळात महावितरणकडेच नवीन वीज रोहित्र उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांना विहीरीवरील पाण्यावरूनच जगविण्याची शेतकर्यांची धडपड पाहता वीज पुरवठा नियमित व सुरळीत अपेक्षीत आहे. मात्र या प्रकारामुळे त्यातच व्यत्यय येत आहे. शासनाने ही समस्या तातडीने निकाली काठावी, अशी मागणी आ. बोंद्रे यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRahul Bondreराहुल बोंद्रे