शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:02 IST

सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला.

 

बुलडाणा: मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने विदर्भाला झुकतेमाप राहील अशी सर्व सामान्यांची अपेक्षा होती. मात्र विदर्भातच पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव मुख्यमंत्र्यांकडून शेतीसाठीच्या वीज धोरणावरून होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. शेतीसाठी वीजेच्या भारनियमनाचे धोरण ठरवितांना पश्चिम व पूर्व विदर्भ असा भेदभाव शासनाने केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यांवर या धोरणामुळे अन्याय झाल्याची भावना आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांना शेतीसाठी १२ तास तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय २० आॅगस्ट २०१८ रोजी एमईआरसी २३९/२१८ क्रमांकाचे परित्रक पारीत करून शासनाने घेतला. त्यातच पश्चिम विदर्भाला दिली जाणारी आठ तासांची वीजही प्रत्यक्षात पाच तासच ती मिळते. मुख्यमंत्री व ऊजार्मंत्री हे विदर्भातीलच असतानाही हा प्रांतिक भेद शेतकर्यांसाठी अन्यायकारक आहे. ज्या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची संख्या जास्त आहे, तेथील शेतकर्यांचा संकटात लोटण्याचा हा प्रकार असल्याचे निवेदनात त्यांनी नमूद केले. पूर्व व पश्चिम विदर्भ असा भेद नकरता पश्चिम विदर्भातही शेतीसाठी १२ तास वीज देण्याचे नियोजन व्हावे, अशी आ. बोंद्रेंची मागणी आहे. वीज रोहीत्र दुरुस्तीची समस्या बुलडाणा जिल्ह्यात वीज रोहित्र जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. नादुरुस्त वीज रोहित्र दीड-दीड महिना होऊनही दुरुस्त केले जात नाही. मुळात महावितरणकडेच नवीन वीज रोहित्र उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांना विहीरीवरील पाण्यावरूनच जगविण्याची शेतकर्यांची धडपड पाहता वीज पुरवठा नियमित व सुरळीत अपेक्षीत आहे. मात्र या प्रकारामुळे त्यातच व्यत्यय येत आहे. शासनाने ही समस्या तातडीने निकाली काठावी, अशी मागणी आ. बोंद्रे यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRahul Bondreराहुल बोंद्रे