शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:02 IST

सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला.

 

बुलडाणा: मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने विदर्भाला झुकतेमाप राहील अशी सर्व सामान्यांची अपेक्षा होती. मात्र विदर्भातच पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव मुख्यमंत्र्यांकडून शेतीसाठीच्या वीज धोरणावरून होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. शेतीसाठी वीजेच्या भारनियमनाचे धोरण ठरवितांना पश्चिम व पूर्व विदर्भ असा भेदभाव शासनाने केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यांवर या धोरणामुळे अन्याय झाल्याची भावना आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांना शेतीसाठी १२ तास तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय २० आॅगस्ट २०१८ रोजी एमईआरसी २३९/२१८ क्रमांकाचे परित्रक पारीत करून शासनाने घेतला. त्यातच पश्चिम विदर्भाला दिली जाणारी आठ तासांची वीजही प्रत्यक्षात पाच तासच ती मिळते. मुख्यमंत्री व ऊजार्मंत्री हे विदर्भातीलच असतानाही हा प्रांतिक भेद शेतकर्यांसाठी अन्यायकारक आहे. ज्या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची संख्या जास्त आहे, तेथील शेतकर्यांचा संकटात लोटण्याचा हा प्रकार असल्याचे निवेदनात त्यांनी नमूद केले. पूर्व व पश्चिम विदर्भ असा भेद नकरता पश्चिम विदर्भातही शेतीसाठी १२ तास वीज देण्याचे नियोजन व्हावे, अशी आ. बोंद्रेंची मागणी आहे. वीज रोहीत्र दुरुस्तीची समस्या बुलडाणा जिल्ह्यात वीज रोहित्र जळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. नादुरुस्त वीज रोहित्र दीड-दीड महिना होऊनही दुरुस्त केले जात नाही. मुळात महावितरणकडेच नवीन वीज रोहित्र उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांना विहीरीवरील पाण्यावरूनच जगविण्याची शेतकर्यांची धडपड पाहता वीज पुरवठा नियमित व सुरळीत अपेक्षीत आहे. मात्र या प्रकारामुळे त्यातच व्यत्यय येत आहे. शासनाने ही समस्या तातडीने निकाली काठावी, अशी मागणी आ. बोंद्रे यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRahul Bondreराहुल बोंद्रे