शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

नाफेडसारख्या योजना लुटण्यासाठी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:27 AM

 शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.तुपकर म्हणाले की, शासनाने शेतकर्‍याच्या वाटेतील काटे काढले नसून,  कर्जमाफीचे अर्ज भरण्यासारख्या योजनेतून वाटेत काटे टाकले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनाने राजकारण करण्यासाठी एक प्रकारे वापर केला. देशातील कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे; पण महाराष्ट्रात सोयाबीनला कमी भाव दिला जात असल्याने हा अन्याय नव्हे काय? नोटबंदी करून सरकारने देशातील जनतेला आर्थिक मंदीत टाकले. शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नसून, आश्‍वासनाची खैरात वाटल्याचा प्रकार शासन करते, ही शोकांतिकाच नव्हे काय? शेतकर्‍यांना शेती पिकवूनही शेतमालाला योग्य भाव न देता त्याचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप करीत देशातील केंद्र व राज्य शासनावर टीका केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी रामदास भोपळे हे होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अमोल राऊत, स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर, विजय पोहनकर, बाळु डोसे यांची समयोचित भाषणे झालीत. व्यासपीठावर श्रीकृष्ण दातार, दामोधर इंगोले, नाना पाटील, मोहन पाटील, रोशन देशमुख, विलास तराळे आदींची उपस्थिती होती. संचालन करून आभार रामेश्‍वर गायकी यांनी मानले. शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.